शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रवेशपत्र डाउनलोड न झाल्यामुळे पाचशेच्यावर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 13:01 IST

अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या २0१९-२0 च्या इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी जिल्ह्यातून ५ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज डाउनलोड न झाल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. प्रवेशपत्र मिळत नसल्याने पालकांनी स्थानिक स्तरावर तक्रारसुद्धा केली; परंतु ही प्रक्रिया केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळाकडून होत असल्याने, स्थानिक स्तरावर जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाला कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यामुळे ५ हजार ५३३ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ९९१ विद्यार्थ्यांनाच परीक्षा देता आली. इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रांवर शनिवारी नवोदयची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लागणार असून, यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बाभूळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या ८0 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)यंदा प्रथमच विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज मागविले होते. पहिल्या टप्प्यात नोंदणी आणि दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड न झाल्यामुळे त्यांना प्रवेशपत्रापासून वंचित राहावे लागले.-मिलिंद बनसोडे,परीक्षा प्रमुख, जवाहर नवोदय विद्यालय.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा