शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट!

By admin | Updated: July 7, 2017 01:35 IST

पातूर तालुक्यात पिके वाचविण्यासाठी पावसाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : मागील सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. खरिपाची अंकुरलेली पिके वाचविण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.पातूर तालुक्यात जून महिन्याच्या ८ ते १० जूनपर्यंत तीन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जूनच्या १५ ते २० तारेखेपर्यंत तालुक्यात शेतकऱ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी केली होती. त्यानंतर १० जूननंतर तुरळक स्वरूपात पाऊस पडला. यादरम्यान बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. सुरुवातीच्या दमदार पावसाने व त्यानंतर आलेल्या तुरळक स्वरूपाच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिकाचे बीज अंकुरण्यास सुरुवात होऊन रोपे वर आली होती. सुरुवातीच्या पेरणीचे लहान रोपेसुद्धा डोलू लागली होती; परंतु मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोपे सुकू लागली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे कडक ऊन तापत असल्याने जमिनीतच कोमेजून गेले. अशा स्थितीत आता दुबार पेरणी करण्याची पाळी बऱ्याच शेतकऱ्यांवर आली आहे.पावसाने दडी मारल्याने व कडक ऊन तापत असल्याने रोपे सुकण्याची व बियाणे जमिनीतच कोमेजण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे दुबार पेरणीची पाळी आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च तर परवडणारा नाही. त्यांच्यावर आधी केलेल्या पेरणीचा खर्च वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांतील नापिकी व शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच १५ दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी आणखी चिंतातुर झालेले आहेत. सद्यस्थितीत दमदार पावसाची प्रतीक्षा असून, सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. नया अंदुरा परिसरातील पिके धोक्यात!जून महिन्याच्या शेवटी शेवटी झालेल्या पावसावर परिसरातील नया अंदुरा, हाता, कारंजा (रम.), निंबा, अंदुरा, शिंगोली, कवठा, बहादुरा परिसरातील पेरणी झाली असून, त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे ही पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी सात-आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थवाहणी म्हणून ओळखल्या जातो, त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. सर्व शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे जूनमध्ये पावसाचे आगमन झाले, त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहित धरून अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. जून महिन्यात झालेल्या या पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिरकाव झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके धोक्यात सापडलेली आहेत.परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीला प्राधान्य दिले आहे. कापसापाठोपाठ सोयाबीन, तूर आणि उडीद, मुगाची पेरणी झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. पाऊस चक्क गायब झाला आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊस होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाला बळी ठरत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. येत्या आठ दिवसात दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकेत शेतकऱ्यांवर ओढवू शकते.