शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट!

By admin | Updated: July 7, 2017 01:35 IST

पातूर तालुक्यात पिके वाचविण्यासाठी पावसाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : मागील सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. खरिपाची अंकुरलेली पिके वाचविण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.पातूर तालुक्यात जून महिन्याच्या ८ ते १० जूनपर्यंत तीन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जूनच्या १५ ते २० तारेखेपर्यंत तालुक्यात शेतकऱ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी केली होती. त्यानंतर १० जूननंतर तुरळक स्वरूपात पाऊस पडला. यादरम्यान बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. सुरुवातीच्या दमदार पावसाने व त्यानंतर आलेल्या तुरळक स्वरूपाच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिकाचे बीज अंकुरण्यास सुरुवात होऊन रोपे वर आली होती. सुरुवातीच्या पेरणीचे लहान रोपेसुद्धा डोलू लागली होती; परंतु मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोपे सुकू लागली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे कडक ऊन तापत असल्याने जमिनीतच कोमेजून गेले. अशा स्थितीत आता दुबार पेरणी करण्याची पाळी बऱ्याच शेतकऱ्यांवर आली आहे.पावसाने दडी मारल्याने व कडक ऊन तापत असल्याने रोपे सुकण्याची व बियाणे जमिनीतच कोमेजण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे दुबार पेरणीची पाळी आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च तर परवडणारा नाही. त्यांच्यावर आधी केलेल्या पेरणीचा खर्च वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांतील नापिकी व शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच १५ दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी आणखी चिंतातुर झालेले आहेत. सद्यस्थितीत दमदार पावसाची प्रतीक्षा असून, सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. नया अंदुरा परिसरातील पिके धोक्यात!जून महिन्याच्या शेवटी शेवटी झालेल्या पावसावर परिसरातील नया अंदुरा, हाता, कारंजा (रम.), निंबा, अंदुरा, शिंगोली, कवठा, बहादुरा परिसरातील पेरणी झाली असून, त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे ही पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी सात-आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थवाहणी म्हणून ओळखल्या जातो, त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. सर्व शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे जूनमध्ये पावसाचे आगमन झाले, त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहित धरून अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. जून महिन्यात झालेल्या या पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिरकाव झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके धोक्यात सापडलेली आहेत.परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीला प्राधान्य दिले आहे. कापसापाठोपाठ सोयाबीन, तूर आणि उडीद, मुगाची पेरणी झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. पाऊस चक्क गायब झाला आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊस होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाला बळी ठरत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. येत्या आठ दिवसात दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकेत शेतकऱ्यांवर ओढवू शकते.