शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

दुबार पेरणीचे संकट!

By admin | Updated: July 7, 2017 01:35 IST

पातूर तालुक्यात पिके वाचविण्यासाठी पावसाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : मागील सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. खरिपाची अंकुरलेली पिके वाचविण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.पातूर तालुक्यात जून महिन्याच्या ८ ते १० जूनपर्यंत तीन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जूनच्या १५ ते २० तारेखेपर्यंत तालुक्यात शेतकऱ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी केली होती. त्यानंतर १० जूननंतर तुरळक स्वरूपात पाऊस पडला. यादरम्यान बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. सुरुवातीच्या दमदार पावसाने व त्यानंतर आलेल्या तुरळक स्वरूपाच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिकाचे बीज अंकुरण्यास सुरुवात होऊन रोपे वर आली होती. सुरुवातीच्या पेरणीचे लहान रोपेसुद्धा डोलू लागली होती; परंतु मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोपे सुकू लागली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे कडक ऊन तापत असल्याने जमिनीतच कोमेजून गेले. अशा स्थितीत आता दुबार पेरणी करण्याची पाळी बऱ्याच शेतकऱ्यांवर आली आहे.पावसाने दडी मारल्याने व कडक ऊन तापत असल्याने रोपे सुकण्याची व बियाणे जमिनीतच कोमेजण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे दुबार पेरणीची पाळी आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च तर परवडणारा नाही. त्यांच्यावर आधी केलेल्या पेरणीचा खर्च वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांतील नापिकी व शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच १५ दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी आणखी चिंतातुर झालेले आहेत. सद्यस्थितीत दमदार पावसाची प्रतीक्षा असून, सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. नया अंदुरा परिसरातील पिके धोक्यात!जून महिन्याच्या शेवटी शेवटी झालेल्या पावसावर परिसरातील नया अंदुरा, हाता, कारंजा (रम.), निंबा, अंदुरा, शिंगोली, कवठा, बहादुरा परिसरातील पेरणी झाली असून, त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे ही पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी सात-आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थवाहणी म्हणून ओळखल्या जातो, त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. सर्व शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे जूनमध्ये पावसाचे आगमन झाले, त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहित धरून अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. जून महिन्यात झालेल्या या पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिरकाव झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके धोक्यात सापडलेली आहेत.परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीला प्राधान्य दिले आहे. कापसापाठोपाठ सोयाबीन, तूर आणि उडीद, मुगाची पेरणी झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. पाऊस चक्क गायब झाला आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊस होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाला बळी ठरत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. येत्या आठ दिवसात दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकेत शेतकऱ्यांवर ओढवू शकते.