शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीची औपचारिकता!

By admin | Updated: December 16, 2014 01:11 IST

केंद्रिय पथक ‘भरकटले’, दौरा चार तास उशिरा.

अकोला : अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाच्या भेटीसाठी पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकरी आतूर झाले होते. या उच्चस्तरीय पथकासमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी ठिकठिकाणी आतुरतेने जमलेले शेतकरी आणि पथकातील अधिकार्‍यांना मात्र दौर्‍याची औपचारिकता आटोपण्याची घाई, असेच काहीसे चित्र सोमवारी पश्‍चिम वर्‍हाडात दिसले. केंद्रातील सचिवस्तरीय अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय पथकाने सोमवारी पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांना भेट दिली. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील माळसावरगाव येथे दुपारी १ वाजता, लोणार तालुक्यातील अंजनीखुर्द गावास दुपारी ४ वाजता, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील इरळा येथे सायंकाळी ७ वाजता, तर अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील मलकापूर येथे रात्री ९ वाजता पथकाने भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. केंद्रिय पथकाने पश्‍चिम वर्‍हाडातील तिन्ही जिल्ह्यांचा दौरा दिवसभरात गुंडाळला. जालन्याहून बुलडाण्याकडे निघालेले हे पथक रस्ता भरकटले आणि दौरा सुरूवातीपासूनच जवळपास चार तास उशिरा चालला. त्यामुळे पथकाच्या प्रतिक्षेत शेतकर्‍यांना ताटकळत बसावे लागले. बुलडाणा जिल्ह्यातील माळसावरगाव आणि अंजनी खुर्द या पहिल्या दोन गावांना पथकाने अनुक्रमे एक आणि अर्धा तास दिला. बुलडाण्यातून वाशिम जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पथकाने शेतकर्‍यांना पुरेसा वेळ देण्याचे टाळले. या जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील इरळा आणि कारंजा तालुक्यातील धोत्रा जहांगिर गावास पथकाने अनुक्रमे अवधी १५ मिनिटं दिली. अकोला जिल्ह्यासही या पथकाने अवघी १७ मिनिटंच दिली. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील नागोला मलकापूर या गावात हे पथक पोहोचले, तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. पथक पोहोचल्यानंतर जवळपास तीन ते चार मिनिटं अधिकार्‍यांसाठी खुच्र्या लावण्यात गेले, तीन मिनिटं गावच्या सरपंचाच्या भाषणात, नंतरची तीन ते चार मिनिटं त्यांच्या स्वागतात आणि उरलेली अवघी पाच मिनिटं शेतकर्‍यांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मिळाली.

कोणत्या गावाला, किती वेळ?

अंजनी खुर्द (बुलडाणा) - ३0 मिनिटं

माळसावरगाव (बुलडाणा) - ६0 मिनिटं

इरळा (वाशिम) - १५ मिनिटं

धोत्रा जहाँगिर (वाशिम) - १५ मिनिटं

नागोला मलकापूर (अकोला) - १७ मिनिटं