शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीची औपचारिकता!

By admin | Updated: December 16, 2014 01:11 IST

केंद्रिय पथक ‘भरकटले’, दौरा चार तास उशिरा.

अकोला : अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाच्या भेटीसाठी पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकरी आतूर झाले होते. या उच्चस्तरीय पथकासमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी ठिकठिकाणी आतुरतेने जमलेले शेतकरी आणि पथकातील अधिकार्‍यांना मात्र दौर्‍याची औपचारिकता आटोपण्याची घाई, असेच काहीसे चित्र सोमवारी पश्‍चिम वर्‍हाडात दिसले. केंद्रातील सचिवस्तरीय अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय पथकाने सोमवारी पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांना भेट दिली. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील माळसावरगाव येथे दुपारी १ वाजता, लोणार तालुक्यातील अंजनीखुर्द गावास दुपारी ४ वाजता, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील इरळा येथे सायंकाळी ७ वाजता, तर अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील मलकापूर येथे रात्री ९ वाजता पथकाने भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. केंद्रिय पथकाने पश्‍चिम वर्‍हाडातील तिन्ही जिल्ह्यांचा दौरा दिवसभरात गुंडाळला. जालन्याहून बुलडाण्याकडे निघालेले हे पथक रस्ता भरकटले आणि दौरा सुरूवातीपासूनच जवळपास चार तास उशिरा चालला. त्यामुळे पथकाच्या प्रतिक्षेत शेतकर्‍यांना ताटकळत बसावे लागले. बुलडाणा जिल्ह्यातील माळसावरगाव आणि अंजनी खुर्द या पहिल्या दोन गावांना पथकाने अनुक्रमे एक आणि अर्धा तास दिला. बुलडाण्यातून वाशिम जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पथकाने शेतकर्‍यांना पुरेसा वेळ देण्याचे टाळले. या जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील इरळा आणि कारंजा तालुक्यातील धोत्रा जहांगिर गावास पथकाने अनुक्रमे अवधी १५ मिनिटं दिली. अकोला जिल्ह्यासही या पथकाने अवघी १७ मिनिटंच दिली. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील नागोला मलकापूर या गावात हे पथक पोहोचले, तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. पथक पोहोचल्यानंतर जवळपास तीन ते चार मिनिटं अधिकार्‍यांसाठी खुच्र्या लावण्यात गेले, तीन मिनिटं गावच्या सरपंचाच्या भाषणात, नंतरची तीन ते चार मिनिटं त्यांच्या स्वागतात आणि उरलेली अवघी पाच मिनिटं शेतकर्‍यांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मिळाली.

कोणत्या गावाला, किती वेळ?

अंजनी खुर्द (बुलडाणा) - ३0 मिनिटं

माळसावरगाव (बुलडाणा) - ६0 मिनिटं

इरळा (वाशिम) - १५ मिनिटं

धोत्रा जहाँगिर (वाशिम) - १५ मिनिटं

नागोला मलकापूर (अकोला) - १७ मिनिटं