शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

जिल्ह्यात दमदार पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:24 IST

अकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यात नदी, नाल्यांना पूर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. पोहरा नाला दुथळी भरून वाहत होता, तर मोहाळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. सातपुड्यातसुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पोपटखेड धरणाच्या जलपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद असून, आतापर्यंत ५0२ मी.मी. पाऊस झाला आहे. शहरातील अकबरी व इफ्तेखार प्लॉटमध्ये नाल्यातील पाणी घरात घुसले. या ठिकाणी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, तलाठी दिनेश मोहोकार, नरेश रतन व नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार यांनी पाहणी केली. शहरातील जिनगरवाडी, शनवारा, खानापूर वेस आदी भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. 

शिर्ला येथे जोरदार पाऊसशिला : परिसरात ९ ऑक्टोबर रोजी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे गावात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परतीच्या पावसाने सोयाबीन सोंगणीची दाणादाण उडवून दिली. त्यामुळे घराच्या उंबरठय़ावर असलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले; मात्र तूर पिकाला पाऊस लाभदायक ठरला आहे. पावसाचा आवेग खूप जास्त असल्याने श्रीकांत पर्वतावरून धबधब्याप्रमाणे  पावसाचा शुभ्रधवल धारा कोसळत होत्या.

बोरगाव परिसरात पावसाची हजेरीबोरगाव मंजू : परिसरात गत दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कापूस व तूर पिकांना संजीवनी मिळाली आहे. सोयाबीन पीक सोंगणीला असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली, तर शेतकर्‍यांची धांदल उडाली असल्याचे चित्र आहे. 

घरात पाणी शिरल्यामुळे रात्रभर जागरणखेट्री : येथे सोमवार रोजी दुपारी मुसळधार पाऊस पडला. पावसाचे पाणी येथील रामदास मालोकार यांच्या घरात शिरल्यामुळे घरातील दोन क्विंटल गहू व २0 किलो उडीद व इतर घरगुती साहित्य असे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरात पाणीच पाणीच साचले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रात्रभर जागरण करून रात्र काढावी लागली. अन्न व धान्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई करून देण्याची मागणी रामदास मालोकार यांनी केली आहे.