शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

जिल्ह्यात दमदार पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:24 IST

अकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यात नदी, नाल्यांना पूर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. पोहरा नाला दुथळी भरून वाहत होता, तर मोहाळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. सातपुड्यातसुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पोपटखेड धरणाच्या जलपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद असून, आतापर्यंत ५0२ मी.मी. पाऊस झाला आहे. शहरातील अकबरी व इफ्तेखार प्लॉटमध्ये नाल्यातील पाणी घरात घुसले. या ठिकाणी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, तलाठी दिनेश मोहोकार, नरेश रतन व नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार यांनी पाहणी केली. शहरातील जिनगरवाडी, शनवारा, खानापूर वेस आदी भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. 

शिर्ला येथे जोरदार पाऊसशिला : परिसरात ९ ऑक्टोबर रोजी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे गावात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परतीच्या पावसाने सोयाबीन सोंगणीची दाणादाण उडवून दिली. त्यामुळे घराच्या उंबरठय़ावर असलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले; मात्र तूर पिकाला पाऊस लाभदायक ठरला आहे. पावसाचा आवेग खूप जास्त असल्याने श्रीकांत पर्वतावरून धबधब्याप्रमाणे  पावसाचा शुभ्रधवल धारा कोसळत होत्या.

बोरगाव परिसरात पावसाची हजेरीबोरगाव मंजू : परिसरात गत दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कापूस व तूर पिकांना संजीवनी मिळाली आहे. सोयाबीन पीक सोंगणीला असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली, तर शेतकर्‍यांची धांदल उडाली असल्याचे चित्र आहे. 

घरात पाणी शिरल्यामुळे रात्रभर जागरणखेट्री : येथे सोमवार रोजी दुपारी मुसळधार पाऊस पडला. पावसाचे पाणी येथील रामदास मालोकार यांच्या घरात शिरल्यामुळे घरातील दोन क्विंटल गहू व २0 किलो उडीद व इतर घरगुती साहित्य असे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरात पाणीच पाणीच साचले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रात्रभर जागरण करून रात्र काढावी लागली. अन्न व धान्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई करून देण्याची मागणी रामदास मालोकार यांनी केली आहे.