शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दमदार पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:24 IST

अकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यात नदी, नाल्यांना पूर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यात व शहरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे १0 ऑक्टोबर रोजी सकाळी मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शहरातील काही घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर पाणी साचले होते. पोपटखेड धरणाच्या जलसाठय़ातसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथळी भरून वाहले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. पोहरा नाला दुथळी भरून वाहत होता, तर मोहाळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने तब्बल तीन तास वाहतूक ठप्प पडली होती. सातपुड्यातसुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पोपटखेड धरणाच्या जलपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५२ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद असून, आतापर्यंत ५0२ मी.मी. पाऊस झाला आहे. शहरातील अकबरी व इफ्तेखार प्लॉटमध्ये नाल्यातील पाणी घरात घुसले. या ठिकाणी तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, तलाठी दिनेश मोहोकार, नरेश रतन व नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार यांनी पाहणी केली. शहरातील जिनगरवाडी, शनवारा, खानापूर वेस आदी भागातील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. 

शिर्ला येथे जोरदार पाऊसशिला : परिसरात ९ ऑक्टोबर रोजी दुपारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे गावात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. परतीच्या पावसाने सोयाबीन सोंगणीची दाणादाण उडवून दिली. त्यामुळे घराच्या उंबरठय़ावर असलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले; मात्र तूर पिकाला पाऊस लाभदायक ठरला आहे. पावसाचा आवेग खूप जास्त असल्याने श्रीकांत पर्वतावरून धबधब्याप्रमाणे  पावसाचा शुभ्रधवल धारा कोसळत होत्या.

बोरगाव परिसरात पावसाची हजेरीबोरगाव मंजू : परिसरात गत दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कापूस व तूर पिकांना संजीवनी मिळाली आहे. सोयाबीन पीक सोंगणीला असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली, तर शेतकर्‍यांची धांदल उडाली असल्याचे चित्र आहे. 

घरात पाणी शिरल्यामुळे रात्रभर जागरणखेट्री : येथे सोमवार रोजी दुपारी मुसळधार पाऊस पडला. पावसाचे पाणी येथील रामदास मालोकार यांच्या घरात शिरल्यामुळे घरातील दोन क्विंटल गहू व २0 किलो उडीद व इतर घरगुती साहित्य असे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरात पाणीच पाणीच साचले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रात्रभर जागरण करून रात्र काढावी लागली. अन्न व धान्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई करून देण्याची मागणी रामदास मालोकार यांनी केली आहे.