शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ पुजला पाचवीलाच!

By admin | Updated: January 3, 2015 01:29 IST

केळी, संत्रा बागा झोपल्या, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान.

विवेक चांदूरकर / अकोलाअकोला : एक वर्षापासून दुष्काळ जणू शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पुजला आहे. गत दोन दिवस झालेल्या अवकाळी अतवृष्टीने आधीच गलितगात्र झालेल्या शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले असून, कशातरी तग धरून असलेल्या केळी, संत्रांच्या फळबागा व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षीचा खरीप व रब्बी हंगाम हातचा गेल्यानंतर या पावसामुळे उरले सुरले पिकाचेही नुकसान झाले आहे. गत वर्षी खरीप हंगामावेळी शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. मात्र, आवश्यकता असताना पाऊस आला नाही. परिणामी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. कोरडवाहू शेतकर्‍यांचा तर लागवडीचाही खर्च निघाला नसून, दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वर्‍हाडातील ६0 ते ७0 टक्के शेतकर्‍यांना खरीप हंगामात तर फटका बसलाच, मात्र परतीचाही पाऊस न आल्याने रब्बी हंगामातही पेरणी करता आली नाही. त्यानंतर कमी प्रमाणात का होईना, शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू पिकांची पेरणी केली.ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी कमी पाण्यातही केळी व संत्र्यांच्या फळबागा जगविल्या. भाजीपाल्याचे पीक घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच जणू शेतकर्‍यांच्या उण्यावर टिपून असलेला पाऊस धडकला. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे संत्रा व केळी या फळबागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.केळीच्या बागा झोपल्या असून, संत्री गळून पडली आहेत. तेल्हारा, पातूर, आकोट तालुक्यातील पणज भागातील, केळी व संत्रा फळबागांचे नुकसान झाले. तसेच शेतात पाणी साचल्याने भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आकोट, पातूर- नंदापूर, बाश्रीटाकळी, अकोला तालुक्यातील चांदूर या भागात भाजीपाल्याचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.भाजीपाल्यासोबतच लाखो हेक्टरवरील कपाशीची झाडे काळी पडली असून, झोपली आहेत. कपाशीची बोंडेही ओली होऊन खाली पडली. तसेच दोन दिवस संततधारमुळे तुरीच्या शेंगामधील दाणे फुगले असून, शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनाची थोडी आस असलेली कपाशी व तुरीचेही नुकसान झाले आहे.