शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अकोल्यातील दुष्काळी गावं झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 21:17 IST

जलसंधारणाच्या कामांमुळे अकोल्यातील दुष्काळी गावांमध्ये पाणी साठा तयार होत आहे.

गजानन वाघमारे /ऑनलाइन लोकमत
अकोला (बार्शीटाकळी), दि. 22 -  बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथे 8 एप्रिलपासून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये माथा ते पायथा याप्रकारे  करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या सलग समतल चरांमध्ये १९ जुलै रोजी झालेल्या पावसाचे पाणी साठले असून, यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले आहे. 
 
पूर्वी वाहून जाणारे पाणी आता या समतल चरामध्ये साचवले जात आहे. पहिल्याच पावसाचा प्रत्येक थेंब जणू गावाच्या शिवारात मुक्कामीच थांबल्याचा भास व्हावा असे मनोहरी चित्र निर्माण झाले आहे. 
 
पुनोती बु. येथे पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत सलग समतल चरांसह जलसंधारणाच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही कामे करण्यासाठी तालुकाचे तहसीलदार रवी काळे, नायब तहसीलदार अतुल पाटोळे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, संघपाल वाहूरवाघ, कृषी विभागाचे कृषी सहायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील माजी पंचायत समिती सदस्य राजू काकड, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, शेतकरी व वॉटर हिरोंनी श्रमदान केले. 
 
त्याची फलनिष्पत्ती १९ जुलैच्या रात्री बार्शीटाकळी तालुक्यात त्यातही पुनोती बु. परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सर्व सलग समतल चर व जलसंधारणाच्या अन्य  बंधा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले असून,  गावाची पाणीटंचाई कायम स्वरूपी दूर होणार असल्याचा आत्मविश्वास आता गावक-यांमध्ये निर्माण झाला आहे.
 
पुनोती बु. येथे मागील काही वर्षात जिल्हा प्रशासनाद्वारे दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.  गाव क्षेत्रामधील जलस्रोतांची पाणीपातळी खूप खोल गेल्याने पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली होती. 
 
त्यावर उपाय म्हणून सरपंच अमोल काकड यांनी यावर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या जलसंधारणाच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभाग घेऊन गावचा माथा असलेल्या भागात सलग समतर चर, डीप सलग समतर चरांचे काम केले. १९ जुलैच्या रात्री पडलेल्या पावसामुळे हे चर उत्तमरीत्या भरले असून, मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. यावर्षी पावसाच्या थेंबांनी जणू गावात मुक्कामच केला असल्याचे चित्र पुनोती बु. येथे पाहावयास मिळत आहे. गावकºयांनी केलेल्या कामातून गाव पाणीदार बनविले आहे.