शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अकोल्यातील दुष्काळी गावं झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 21:17 IST

जलसंधारणाच्या कामांमुळे अकोल्यातील दुष्काळी गावांमध्ये पाणी साठा तयार होत आहे.

गजानन वाघमारे /ऑनलाइन लोकमत
अकोला (बार्शीटाकळी), दि. 22 -  बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथे 8 एप्रिलपासून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये माथा ते पायथा याप्रकारे  करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या सलग समतल चरांमध्ये १९ जुलै रोजी झालेल्या पावसाचे पाणी साठले असून, यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले आहे. 
 
पूर्वी वाहून जाणारे पाणी आता या समतल चरामध्ये साचवले जात आहे. पहिल्याच पावसाचा प्रत्येक थेंब जणू गावाच्या शिवारात मुक्कामीच थांबल्याचा भास व्हावा असे मनोहरी चित्र निर्माण झाले आहे. 
 
पुनोती बु. येथे पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत सलग समतल चरांसह जलसंधारणाच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही कामे करण्यासाठी तालुकाचे तहसीलदार रवी काळे, नायब तहसीलदार अतुल पाटोळे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, संघपाल वाहूरवाघ, कृषी विभागाचे कृषी सहायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील माजी पंचायत समिती सदस्य राजू काकड, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, शेतकरी व वॉटर हिरोंनी श्रमदान केले. 
 
त्याची फलनिष्पत्ती १९ जुलैच्या रात्री बार्शीटाकळी तालुक्यात त्यातही पुनोती बु. परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सर्व सलग समतल चर व जलसंधारणाच्या अन्य  बंधा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले असून,  गावाची पाणीटंचाई कायम स्वरूपी दूर होणार असल्याचा आत्मविश्वास आता गावक-यांमध्ये निर्माण झाला आहे.
 
पुनोती बु. येथे मागील काही वर्षात जिल्हा प्रशासनाद्वारे दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.  गाव क्षेत्रामधील जलस्रोतांची पाणीपातळी खूप खोल गेल्याने पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली होती. 
 
त्यावर उपाय म्हणून सरपंच अमोल काकड यांनी यावर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या जलसंधारणाच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभाग घेऊन गावचा माथा असलेल्या भागात सलग समतर चर, डीप सलग समतर चरांचे काम केले. १९ जुलैच्या रात्री पडलेल्या पावसामुळे हे चर उत्तमरीत्या भरले असून, मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. यावर्षी पावसाच्या थेंबांनी जणू गावात मुक्कामच केला असल्याचे चित्र पुनोती बु. येथे पाहावयास मिळत आहे. गावकºयांनी केलेल्या कामातून गाव पाणीदार बनविले आहे.