शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

अकोल्यातील दुष्काळी गावं झाली पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 21:17 IST

जलसंधारणाच्या कामांमुळे अकोल्यातील दुष्काळी गावांमध्ये पाणी साठा तयार होत आहे.

गजानन वाघमारे /ऑनलाइन लोकमत
अकोला (बार्शीटाकळी), दि. 22 -  बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथे 8 एप्रिलपासून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये माथा ते पायथा याप्रकारे  करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या सलग समतल चरांमध्ये १९ जुलै रोजी झालेल्या पावसाचे पाणी साठले असून, यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले आहे. 
 
पूर्वी वाहून जाणारे पाणी आता या समतल चरामध्ये साचवले जात आहे. पहिल्याच पावसाचा प्रत्येक थेंब जणू गावाच्या शिवारात मुक्कामीच थांबल्याचा भास व्हावा असे मनोहरी चित्र निर्माण झाले आहे. 
 
पुनोती बु. येथे पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत सलग समतल चरांसह जलसंधारणाच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ही कामे करण्यासाठी तालुकाचे तहसीलदार रवी काळे, नायब तहसीलदार अतुल पाटोळे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक समाधान वानखडे, संघपाल वाहूरवाघ, कृषी विभागाचे कृषी सहायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील माजी पंचायत समिती सदस्य राजू काकड, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, शेतकरी व वॉटर हिरोंनी श्रमदान केले. 
 
त्याची फलनिष्पत्ती १९ जुलैच्या रात्री बार्शीटाकळी तालुक्यात त्यातही पुनोती बु. परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सर्व सलग समतल चर व जलसंधारणाच्या अन्य  बंधा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे हे दुष्काळी गाव पाणीदार झाले असून,  गावाची पाणीटंचाई कायम स्वरूपी दूर होणार असल्याचा आत्मविश्वास आता गावक-यांमध्ये निर्माण झाला आहे.
 
पुनोती बु. येथे मागील काही वर्षात जिल्हा प्रशासनाद्वारे दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.  गाव क्षेत्रामधील जलस्रोतांची पाणीपातळी खूप खोल गेल्याने पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली होती. 
 
त्यावर उपाय म्हणून सरपंच अमोल काकड यांनी यावर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या जलसंधारणाच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभाग घेऊन गावचा माथा असलेल्या भागात सलग समतर चर, डीप सलग समतर चरांचे काम केले. १९ जुलैच्या रात्री पडलेल्या पावसामुळे हे चर उत्तमरीत्या भरले असून, मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. यावर्षी पावसाच्या थेंबांनी जणू गावात मुक्कामच केला असल्याचे चित्र पुनोती बु. येथे पाहावयास मिळत आहे. गावकºयांनी केलेल्या कामातून गाव पाणीदार बनविले आहे.