शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

विदर्भातील सात जिल्ह्यांवर मदतीचा दुष्काळ!

By admin | Updated: March 12, 2016 02:29 IST

विदर्भावर अन्याय; विदर्भातील केवळ ५३५ गावांचाच समावेश.

ब्रम्हानंद जाधव/मेहकरविदर्भात दुष्काळाच्या झळा अधिक असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीत विदर्भावर अन्याय दिसून येत आहे. राज्यात सन २0१५-१६ मध्ये एकूण १४ हजार ७0८ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली असून, राज्याच्या तुलनेत विदर्भातील केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेशच नसल्याचे या जिल्ह्यांवर शासनाच्या मदतीचाही दुष्काळ आहे. दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. खरीप व रब्बी हंगामातील नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये शासनाकडून विविध योजना राबवून शेतकर्‍यांना आधार दिला जात आहे. गतवर्षी राज्यभर अत्यल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली, तर विदर्भातील शेतकर्‍यांना शेतीसाठी लागलेला खर्चही भरून निघाला नाही. सन २0१५-१६ मधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी काढून ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांकरिता शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात; मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ असतानाही पैसेवारी जास्त दाखविण्यात आलेली आहे. राज्यातील ४0 हजार ५३ गावांमध्ये पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये १४ हजार ७0८ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी व २५ हजार ३४५ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त दाखविण्यात आलेली आहे. तथापि, राज्याच्या तुलनेत विदर्भातून सर्वांत कमी गावांचा समावेश ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीत करण्यात आला आहे. विदर्भातील १५ हजार २६४ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विदर्भातून केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आली आहे, तर १४ हजार ७२९ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त दाखविण्यात आलेली आहे. दुष्काळ अधिक असूनही पैसेवारीमध्ये राज्याच्या इतर विभागांच्या तुलनेत विदर्भावर अन्याय झाला असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सात जिल्ह्यांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेशच नाही. त्यामुळे ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना मिळणार्‍या शासानाच्या विविध योजनांच्या लाभापासून विदर्भातील सात जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना वंचित राहावे लागणार आहे.विदर्भ दुष्काळात समोर; पैसेवारीत माघारसन २0१५-१६ खरीप हंगामातील हंगामी पैसेवारीमध्ये विदर्भातील अनेक गावांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. विदर्भातील अमरावती विभागामध्ये तर केवळ ५७ गावांचाच ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ५५ व यवतमाळ जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश आहे. नागपूर विभागातून ४७८ गावांचा ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १११ व गडचिरोली जिल्ह्यातील ३६७ गावांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या तुलनेत विदर्भातील केवळ ५३५ गावांचीच पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी दाखविण्यात आल्याने विदर्भाबाबत ह्यदुष्काळात समोर, तर पैसेवारीत माघारह्ण अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.