शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नाले, गटारे तुंबली; क्षेत्रीय अधिकारी,आरोग्य निरीक्षक झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 13:14 IST

अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासकीय प्रभागांसह पडीत प्रभागांची अवस्था अत्यंत केविलवाणी असून, नागरिकांच्या हिताचा आव आणणाºया महापालिका प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. साफसफाईच्या संदर्भात शहराचे केविलवाणे चित्र ध्यानात घेता मनपाचे क्षेत्रीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक झोपेत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी त्यांच्या उद्देशाला संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४० सफाई कर्मचारी असून, त्यांची प्रशासकीय प्रभागात विभागणी करण्यात आली आहे. तर २३ प्रभागांमध्ये (पडीत) खासगी तत्त्वावर प्रत्येकी १४ सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पडीत प्रभागात १४ पैकी केवळ ४ ते पाच खासगी कर्मचाºयांच्या माध्यमातून सर्व्हिस लाइनची थातूर-मातूर स्वच्छता केली जाते. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट नगरसेवक किंवा त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी मिळवले आहेत. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रभागात ठिकठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. संपूर्ण शहरातील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.लाखो रुपये कोणाच्या घशात?दरवर्षी मनपाकडून मान्सूनपूर्व नाला सफाई केली जाते. तळ दिसेपर्यंत नाल्यांची स्वच्छता करण्याचा दावा मनपाकडून केला जात असतानाच अवघ्या सहा महिन्यांतच नाले घाणीने तुंबलेले दिसतात. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी एक मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या नाल्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला होता. नाला सफाईवर सन २०१७ मध्ये ३६ लक्ष तर २०१८ मध्ये ५९ लक्ष रुपये खर्च झाले. नाला सफाईवर लाखोंचा खर्च होत असला तरी समस्या ‘जैसे थे’ राहत असल्याने लाखो रुपये नेमके कोणाच्या घशात जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नाला सफाईच्या कामाचे ‘जीओ टॅँगिग’करण्याची गरज आहे.

आरोग्य निरीक्षक नव्हे पांढरे हत्ती!प्रभागातील दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश आरोग्य निरीक्षक नगरसेवकांच्या इशाºयानुसार काम करतात. शहरात स्वच्छतेची समस्या लक्षात घेता, आरोग्य निरीक्षक ांना निव्वळ पोसण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका