शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, आराेग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

अकोला : पावसाळ्यात दूषित पाणी, अर्धवट शिजलेले अन्न व रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आदींमुळे पोटाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ...

अकोला : पावसाळ्यात दूषित पाणी, अर्धवट शिजलेले अन्न व रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आदींमुळे पोटाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हॉटेल उघडले तरी जिभेचे लाड नको, सकस व शक्यतो घरचेच ताजे अन्नपदार्थ सेवन करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे आहे. पावसाळ्यात दूषित पाण्याने अनेक आजार उद्भवतात. पावसाळा सक्रिय झाला आहे. सर्वत्र दमट हवा असते. यामुळे पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. अनेक दिवसांनंतर आता हॉटेल्सही उघडू लागली आहेत. मात्र, पावसाळ्यात पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात बाहेर खाणे टाळायला हवे. पावसाळ्यात पचनास हलका असा आहार घेणे अपेक्षित आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. तेव्हा सकस, शुद्ध, पोषक, घरचे अन्नच खावे.

विविध प्रकारच्या भाज्या, फळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत करतात. त्यामुळे त्याचे आहारातील प्रमाण वाढवावे.

मसाल्याचे पदार्थदेखील जसे की मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जिरे, लिंबू आदी पचन संस्था नीट काम करण्यासाठी मदत करतात.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

दूषित पाण्याची समस्या असल्याने पाणीपुरी, दहीपुरी आदी चटकदार पदार्थ खाणे टाळावे.

कृत्रिम रंगाने बनविलेले पदार्थ, चायनीज पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

कार्बनेटेड पेयांमुळे शरीरातील मिनिरल्स कमी होतात तसेच शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमता मंदावते. यामुळे अपचन होऊ शकते.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. बॅक्टेरिया, विषाणूचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. पदार्थ बनविण्यासाठी अनेकदा शुद्ध पाणी नसते, गाळलेले किंवा उकळलेले पाणी नसते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या अन्नावर माशा बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवत असल्याने रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.

हॉटेलमध्ये एकदाच घेतलेल्या तेलाचा वारंवार वापर होतो. हे तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय, अशा पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. विविध प्रकारच्या डाळी, फळांचे प्रमाण वाढवावे. पचनास हलके अन्न घ्यावे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी.

- मुक्ता बगडिया, आहारतज्ज्ञ, अकोला