शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पोटाची खळगी भरत नाही; थांबून तरी काय करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:33 IST

रस्त्यात जेवण मिळो वा ना मिळो; परंतु घरी जाण्याची ओढ असल्याने या युवकांनी हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचे संकट गडद होत असतानाच जालना येथील स्टील इंडस्ट्रीजमध्ये रोजंदारीने कामावर असलेल्या उत्तर प्रदेशातील तब्बल २४ मजुरांनी राष्ट्रीय महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांच्याच सोबत असलेल्या आणखी १६ मजुरांचा जथा त्यांच्या पुढे गेला असून, ते नागपूरपर्यंत पोहोचले, तर २४ मजुरांचा हा गट शुक्रवारी अकोल्यातून नागपूरकडे हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करीत होते. पोटाची खळगी भरत नाही, आता थांबून काय करणार रस्त्यात जेवण मिळो वा ना मिळो; परंतु घरी जाण्याची ओढ असल्याने या युवकांनी हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले.जालना येथील स्टील उद्योग देशात प्रसिद्ध आहे. येथे उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यातील ६० च्या वर मजूर कामाला होते; मात्र कोरोनाचे संकट सुरू होताच लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे जालना येथील स्टील उद्योगही बंद पडला. मजुरांचे दोन वेळ जेवणाचे वांधे झाले. त्यामुळे या मजुरांनी महाराष्ट्र सोडून त्यांच्या उत्तर प्रदेशातील गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र ज्यांच्याकडे कामाला होते, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने या युवकांनी गत आठवड्यात उत्तर प्रदेशात जाण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. जालना येथून अकोला आल्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन राष्ट्रीय महामार्गाने ते नागपूर मार्गे पुढे उत्तर प्रदेशात जाण्यासाठी त्यांनी हा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला.महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकने जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या भीतीने एकही वाहन त्यांना मिळत नसल्याची खंतही यावेळी मजुरांनी व्यक्त केली.उद्योजकांनी सोडले वाºयावर!जालन्यातील ज्या स्टील इंडस्ट्रीजमध्ये हे मजूर कामाला होते, त्याच उद्योजकाने यांना उत्तर प्रदेशात सोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली; मात्र उद्योजकाने पगारही बंद करून एमआयडीसी सोडण्याचे सांगितले.त्यामुळे हजारो किलोमीटरचा हा पायी प्रवास करावा लागत असल्याचेही त्यांनी यावेळी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार