शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका! -  रावसाहेब दानवे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:59 IST

देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

अकोला: सत्तेच्या उण्यापुऱ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत भाजपाने देशात विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली. देशात जातीयवादाला थारा न दिल्यामुळेच जातीय दंगली भडकल्या नाहीत, याची पुरेपूर जाण सर्वसामान्य जनतेला आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. विकास कामांच्या बळावरच देशात पुन्हा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.रामदासपेठस्थित मराठा मंडळ मंगल कार्यालयात भाजपाच्या निवडणूक संचालन समिती आघाडी प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात होते तर व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, खा. अ‍ॅड. संजय धोत्रे, ना. डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, आ. हरीश पिंपळे, माजी आ. विजयराव जाधव, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, उपमहापौर वैशाली शेळके आदी विराजमान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकास कामांची काँग्रेससह विरोधकांनी धास्ती घेतली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने देशाला अस्थिर करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर मात करण्यासाठी पक्ष संघटन महत्त्वाचे असून, सर्वांनी एकदिलाने काम करा, देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा