शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका! -  रावसाहेब दानवे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:59 IST

देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

अकोला: सत्तेच्या उण्यापुऱ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत भाजपाने देशात विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली. देशात जातीयवादाला थारा न दिल्यामुळेच जातीय दंगली भडकल्या नाहीत, याची पुरेपूर जाण सर्वसामान्य जनतेला आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरणाची चिंता न करता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन मंगळवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. विकास कामांच्या बळावरच देशात पुन्हा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.रामदासपेठस्थित मराठा मंडळ मंगल कार्यालयात भाजपाच्या निवडणूक संचालन समिती आघाडी प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात होते तर व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, खा. अ‍ॅड. संजय धोत्रे, ना. डॉ. रणजित पाटील, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, आ. हरीश पिंपळे, माजी आ. विजयराव जाधव, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, उपमहापौर वैशाली शेळके आदी विराजमान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकास कामांची काँग्रेससह विरोधकांनी धास्ती घेतली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने देशाला अस्थिर करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर मात करण्यासाठी पक्ष संघटन महत्त्वाचे असून, सर्वांनी एकदिलाने काम करा, देशातील राजकीय वातावरणाची चिंता करू नका, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीए सरकार विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा