शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घालू नका - आमदार गोपीकिशन बाजोरिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:52 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले.

अकोला: अलीकडच्या काळात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. युवक तर सुसाट वाहने दामटताना दिसतात. पोलीस वाहतूक नियमांबाबत जनजागृती करतात; परंतु अनेक वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकही मुलांच्या हाती दुचाकी देतात. हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करीत, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले.पोलीस दलाच्यावतीने ४ जानेवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात वाहतूक सजगता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक गौरव भांबरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नीलेश देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. मानसा कलासागर यांचीही विशेष उपस्थिती होती.त्यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी वाहतूक पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या चौकींचे उद्घाटन करण्यात केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वाहतूक सजगता मोहिमेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ‘जंबुरे का खेल’ पथनाट्य नीलेश गाडगे, संजय भगत, योगेश जऊळकार, राहुल तायडे, गजानन केदारे, नम्रता लाड, पूजा पालिवाल, भाग्यश्री मेसरे, संजीवनी नागरे, श्रीकांत तळोकार व कार्तिक काळे यांच्या चमूने सादर करून उपस्थितांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्यासह मुन्ना ठाकूर, मनोज ठाकूर, उमेश इंगळे, पद्मसिंग बैस, नीता संके, अश्विनी माने, पूजा दांडगे व दीपाली नारनवरे या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धापोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय येथे ७ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गामधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, तसेच विद्यार्थी व पालकांना वाहतूक नियमांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्मेटबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोमवारी हेल्मेट रॅलीसुद्धा काढण्यात येणार आहे.

दरवर्षी होतात पाच लाख अपघात!भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात घडतात. २0१६ च्या अहवालानुसार या अपघातांमध्ये १.५१ लाख लोकांचा मृत्यू होतो. पाच लाख लोकांना दिव्यांगत्व येते. सर्वाधिक २३.९ टक्के अपघात हे दुचाकीमुळे होतात.

 

टॅग्स :AkolaअकोलाGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाTrafficवाहतूक कोंडी