शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात घालू नका - आमदार गोपीकिशन बाजोरिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:52 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले.

अकोला: अलीकडच्या काळात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. युवक तर सुसाट वाहने दामटताना दिसतात. पोलीस वाहतूक नियमांबाबत जनजागृती करतात; परंतु अनेक वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. पालकही मुलांच्या हाती दुचाकी देतात. हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करीत, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, घरी आपली कोणीतरी वाट पाहतात, याचे भान असू द्या, अशा शब्दात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आवाहन केले.पोलीस दलाच्यावतीने ४ जानेवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात वाहतूक सजगता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक गौरव भांबरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नीलेश देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. मानसा कलासागर यांचीही विशेष उपस्थिती होती.त्यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी वाहतूक पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या चौकींचे उद्घाटन करण्यात केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वाहतूक सजगता मोहिमेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ‘जंबुरे का खेल’ पथनाट्य नीलेश गाडगे, संजय भगत, योगेश जऊळकार, राहुल तायडे, गजानन केदारे, नम्रता लाड, पूजा पालिवाल, भाग्यश्री मेसरे, संजीवनी नागरे, श्रीकांत तळोकार व कार्तिक काळे यांच्या चमूने सादर करून उपस्थितांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्यासह मुन्ना ठाकूर, मनोज ठाकूर, उमेश इंगळे, पद्मसिंग बैस, नीता संके, अश्विनी माने, पूजा दांडगे व दीपाली नारनवरे या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धापोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय येथे ७ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गामधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, तसेच विद्यार्थी व पालकांना वाहतूक नियमांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्मेटबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोमवारी हेल्मेट रॅलीसुद्धा काढण्यात येणार आहे.

दरवर्षी होतात पाच लाख अपघात!भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात घडतात. २0१६ च्या अहवालानुसार या अपघातांमध्ये १.५१ लाख लोकांचा मृत्यू होतो. पाच लाख लोकांना दिव्यांगत्व येते. सर्वाधिक २३.९ टक्के अपघात हे दुचाकीमुळे होतात.

 

टॅग्स :AkolaअकोलाGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाTrafficवाहतूक कोंडी