शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दुबार पेरणीचे पंचनामे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:29 IST

पालकमंत्र्यांचे निर्देश : मूर्तिजापूर येथे कृषी समाधान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: शेतीच्या चांगल्या उत्पादक क्षमतेसाठी सर्व शेतींची मृदा आरोग्य पत्रिका काढली जाईल. कृषी औजरांसाठी यांत्रिकी बँक स्थापन केली जाईल. पीक विम्याची भरपाई न करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली जाईल. शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून खडीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दुबार पेरणीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. मूर्तिजापूर येथे आज आयोजित कृषी समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी आमदार हरीश पिंपळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भय्यासाहेब तिडके, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळे आदींसह सर्व कृषी विभागासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपले जीवन सुखी करावे. शेतकऱ्यांच्या अन्य अडचणीही प्राधान्याने सोडविल्या जातील. शेतकऱ्यांचे समाधान हेच शासनाचे ध्येय आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यात प्रथमच अकोला जिल्ह्यात कृषी समाधान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुबार पेरणीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना निश्चितपणे अर्थसाह्य दिले जाईल. मागील वर्षी पीक विम्याचे पैसे न देणाऱ्या कंपनीच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जातील. जलयुक्तच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी स्वामी समर्थ शेतकरी स्वयंम सहायता शेतकरी बचतगटाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीला ११ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. शेतकरी आत्महत्याग्रस्त बेबीनंदा विश्वनाथ राऊत यांना धनादेश देण्यात आला. शिबिरात एकूण ९५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय डागा, कमलाकर गावंडे, नारायण भटकर, भारत भगत, राजेंद्र हंडे, संतोष सारडा, संतोष शर्मा, आरिफभाई, राहुल पाटील, राजू नासणे, राजू सरदार, दिग्विजय गाडेकर, गजानन नाकट, संदीप जळमकर, राहुल गुल्हाने, सचिन देशमुख, हर्षल साबळे, अविनाश यावले, रितीष शाबसकर, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.