शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

 पाणी फाउंडेशनच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By atul.jaiswal | Updated: May 2, 2018 18:50 IST

अकोला :- श्रमदान हे श्रेष्ठदान असून पाणी फाउंडेशनच्या कामासाठी वित्तीय किंवा इंधनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील शहापूर (रूपागड) गावात   पालकमंत्री यांनी हातात फावडे व टोपले घेवून  स्वत: केले श्रमदान. डॉ. रणजीत पाटील यांचे गावातील लोकांनी  वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत केले. वॉटर स्पर्धेत बक्षिस मिळविण्याचा निर्धार या गावातील गावक-यांनी केला असून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.  

अकोला :- श्रमदान हे श्रेष्ठदान असून पाणी फाउंडेशनच्या कामासाठी वित्तीय किंवा इंधनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. पाणी फाउंडेशनच्या  वॉटर कप स्पर्धेत  प्रथमच सहभागी झालेला अकोट तालुक्यातील शहापूर (रूपागड) गावात  1 मे महाराष्ट्र दिनानिमित्य आयोजीत महाश्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी  शहापूरचे सरपंच  सोनाजी बारे,  उपसरपंच श्री पवार, अकोट उपविभागीय अधिकारी उदय राजपूत , तहसिलदार विश्वनाथ घुगे,  तुषार अढावू , चंचल पितांबरवाले, आकाश धुमाळे, कमलेश राठी, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक मनिष महल्ले, समेध खंडारे, आशिष मोहरळे ,परेश गाडगे, महानगर अध्यक्ष डॉ.अशोक कोळंबे, योगेश नाठे, महादेव बकाल, डॉ. लांडे, दिलीप बोचे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          भविष्यात पाणी प्रश्न भिषण होणार आहे. यामुळे पावसाचे पाणी अडविणे व पाणी जिरविणे अत्यंत आवश्यक असून  शहापूर रूपागड हे गाव पंचमहाभुतांनी  व्यापलेले असून या ठिकाणी  पावसाचे  पाणी  डोंगरातून  जोरात येते व ते वाहून जाते त्या पाण्यात अडविण्याचे काम व ते जमिनीत जिरविण्याचे काम शहापूर  रूपागड   गावक-यांनी  केले आहे, ही अत्यंत अभिमानाची  बाब असून  त्याग, संकल्प  व सचोटी असेल  तर कोणतेही काम अशक्य नसल्याचे गावक-यांनी दाखवून   दिले असून याकामी त्यांना पाणी फाउंडेशन व  भूमी फाउंडेशनचे कार्यकर्ते सहकार्य करत आहे. ही अत्यंत कौतूकाची बाब असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

            डॉ. रणजीत पाटील यांचे गावातील लोकांनी  वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत केले. गावातील  सुवासिनीनी त्यांना कुकूंम तिलक लावून औक्षण केले. डॉ. रणजीत पाटील यांनी हातात फावडे व टोपले घेवून  हजारो गावकरी   व  जलमित्रांसोबत स्वत:  श्रमदान  केले. व गावक-यांचा उत्साह वाढला. शहापूर  रूपागड  हे गाव  आदिवासी गाव असून सातपूडयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावातील जमिन  डोंगराळ असून  सर्व  गावक-यांनी  एकत्र येवून उन्हातान्हात श्रमदान करीत आहे. पाण्यासाठी  गाव पेटून उठले असल्याचे चित्र येथे दिसून येते. या ठिकाणी  सलग समतलचर,  गाळ काढणे,  शेततळे ,दगडी बांध, माती नाला बांध, नाला खोलीकरण आदी जलसंधारणाची कामे श्रमदानातून मोठया प्रमाणात चालू आहेत. पाणी फाउंडेशन वॉटर स्पर्धेत बक्षिस मिळविण्याचा निर्धार या गावातील गावक-यांनी केला असून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.    

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाguardian ministerपालक मंत्री