शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

जलजीवन मिशनचे विभागीय ‘भारत निर्माण कक्ष’ बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 12:19 IST

Jal Jeevan Mission भारत निर्माण कक्ष भारत निर्माण कक्ष ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आले.

अकोला : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागीय स्तरावरील भारत निर्माण कक्ष बंद करून, या कक्षांमध्ये प्रतिनियुक्तीवरील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) मूळ आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार विभागीय भारत निर्माण कक्ष भारत निर्माण कक्ष ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आले असून, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘मजीप्रा’ अंतर्गत रुजू करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागीय भारत निर्माण कक्ष चालविण्यासाठी तरतूद उपलब्ध नसल्याने, विभागीय स्तरावरील संबंधित तीनही भारत निर्माण कक्ष बंद करून, या कक्षांमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागामार्फत ३० सप्टेंबर रोजी घेण्यात आला. या कक्षांमध्ये कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचाºयांच्या सेवा मूळ संवर्गात ‘मजीप्रा’ च्या आस्थापनेवर सुपूर्द करण्यात येत असून, संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना मजीप्राच्या आस्थापनेवर रुजू करण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय स्तरावरील भारत निर्माण कक्ष ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आले असून, प्रतिनियुक्ती वरील अधिकारी-कर्मचाºयांना ‘मजीप्रा’मध्ये रुजू करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.वेतन, भत्त्यासाठी देणार ३३ लाख!अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागीय भारत निर्माण कक्षातील अधिकारी व कर्मचाºयांच्या अधिकारी व कर्मचारी जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील वेतन व भत्ते तसेच कार्यालयीन खर्चासाठी ३३ लाख ६५ हजार ८१३ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना