शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

गांधीग्राम येथे जिल्हा काँग्रेसचा किसान अधिकार दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:24 IST

Akola Congress News काँग्रेस देशभर किसान अधिकार दिन साजरा करीत आहे.

अकोला : केंद्र सरकारने भांडवलदारांच्या हितासाठी देशभरातील कास्तकार व कामगारांच्या प्रचलित कायद्यांना पायदळी तुडवून त्या जागी नवीन कृषी कायदे अमलात आणले आहेत.यातील तीन नियम हे कास्तकारांना कायमचे संपविण्यासाठी पुरेसे असून या काळया कृषी बिलाला कास्तकार व कामगारांनी विरोध करून हे बिल हाणून पाडण्याचे आवाहन काँगेस नेत्यांनी केले.माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त काँग्रेस देशभर किसान अधिकार दिन साजरा करीत आहे. या पर्वात कोट्यवधी कास्तकारांच्या निषेध सहयांचे निवेदन राष्ट्रपती यांना देण्यात येत आहेत.या पर्वावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथून जवळच असलेल्या गांधी ग्राम येथील गांधी विद्यालयात किसान अधिकार दिन साजरा करण्यात आला.काँग्रेसचे अकोला पूर्व निरीक्षक अविनाश देशमुख तथा इंटक नेते प्रदिप वखारिया यांनी साकार केलेल्या व जिल्हा काँग्रस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात  स्वाक्षरी समिती अध्यक्ष अशोकराव अमानकर,काँग्रेस नेते डॉ. सुभाषचंद्र कोरपे,विवेक पारसकर, संजय बोडखे, अकोट तालुका अध्यक्ष प्रशांत पाचडे,जिल्हा उपाध्यक्ष हेमंत देशमुख, डॉ.पुरुषोत्तम दातकर,जिल्हा महासचिव आरिफभाई,युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, जि.प.सदस्य गजानन डाके,माजी जि.प.सदस्य आलमगिर खान,यु. काँ.प्रदेश सचिव सागर कावरे,मनीष भांबुरकर,राजू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.सोहळ्याचा प्रारंभ महात्मा गांधी यांच्या पुतळा हारार्पण व सरदार पटेल प्रतिमा पूजनाने करण्यात आला.या वेळी या अभिनव आंदोलनाची माहिती उपस्थित कास्तकार व कामगार वर्गाला देण्यात आली. राज्यभरात काँग्रेसच्या वतीने जागोजागी शेतकरी व कामगार बचाव आंदोलन सुरू केलेआहे.या अनुषंगाने कास्तकार व कामगार वर्गाला केंद्र सरकारच्या जाचक त्रासातून मुक्तता मिळावी,शेतकरी व कामगार वर्गाचे काळे कायदे रद्द व्हावेत यासाठी हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला असून जिल्हाभरात पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने नागरिक स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.यात कास्तकार व मजूर वर्गाने सहभागी होऊन या काळया कृषी बिलाचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी डॉ. कोरपे,मनीष भांबुरकर, अमानकर, ढोके,हेमंत देशमुख,अविनाश देशमुख, वाखारिया आदींनी मार्गदर्शन करीत कृषी बिल हाणून पाडण्याचे आवाहन केले.संचालन हारून शहा यांनी तर आभार सागर कावरे यांनी मानले.राष्ट्रगीताने या सत्याग्रह आंदोलनाचे समापन करण्यात आले. सामाजिक अंतर राखीत संपन्न या किसान अधिकार दिन सत्याग्रहात यावेळी विलास गोतमारे,गणेश कळसकर,राजीव इटोले,अलख राहणे,अनुराग वानरे मोहसिन बेग, राजेश भालतीलक,सुनील वासनकर,मुकुंद सनगाळे,संतोष देशमुख,गणेश ठाकूर,गांधी विद्यालयाचे संचालक रामचंद्र इंगळे, विठ्ठलराव चोपडे समवेत पंचक्रोशीतील कास्तकार,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसAkolaअकोला