शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

गांधीग्राम येथे जिल्हा काँग्रेसचा किसान अधिकार दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:24 IST

Akola Congress News काँग्रेस देशभर किसान अधिकार दिन साजरा करीत आहे.

अकोला : केंद्र सरकारने भांडवलदारांच्या हितासाठी देशभरातील कास्तकार व कामगारांच्या प्रचलित कायद्यांना पायदळी तुडवून त्या जागी नवीन कृषी कायदे अमलात आणले आहेत.यातील तीन नियम हे कास्तकारांना कायमचे संपविण्यासाठी पुरेसे असून या काळया कृषी बिलाला कास्तकार व कामगारांनी विरोध करून हे बिल हाणून पाडण्याचे आवाहन काँगेस नेत्यांनी केले.माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त काँग्रेस देशभर किसान अधिकार दिन साजरा करीत आहे. या पर्वात कोट्यवधी कास्तकारांच्या निषेध सहयांचे निवेदन राष्ट्रपती यांना देण्यात येत आहेत.या पर्वावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथून जवळच असलेल्या गांधी ग्राम येथील गांधी विद्यालयात किसान अधिकार दिन साजरा करण्यात आला.काँग्रेसचे अकोला पूर्व निरीक्षक अविनाश देशमुख तथा इंटक नेते प्रदिप वखारिया यांनी साकार केलेल्या व जिल्हा काँग्रस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात  स्वाक्षरी समिती अध्यक्ष अशोकराव अमानकर,काँग्रेस नेते डॉ. सुभाषचंद्र कोरपे,विवेक पारसकर, संजय बोडखे, अकोट तालुका अध्यक्ष प्रशांत पाचडे,जिल्हा उपाध्यक्ष हेमंत देशमुख, डॉ.पुरुषोत्तम दातकर,जिल्हा महासचिव आरिफभाई,युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, जि.प.सदस्य गजानन डाके,माजी जि.प.सदस्य आलमगिर खान,यु. काँ.प्रदेश सचिव सागर कावरे,मनीष भांबुरकर,राजू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.सोहळ्याचा प्रारंभ महात्मा गांधी यांच्या पुतळा हारार्पण व सरदार पटेल प्रतिमा पूजनाने करण्यात आला.या वेळी या अभिनव आंदोलनाची माहिती उपस्थित कास्तकार व कामगार वर्गाला देण्यात आली. राज्यभरात काँग्रेसच्या वतीने जागोजागी शेतकरी व कामगार बचाव आंदोलन सुरू केलेआहे.या अनुषंगाने कास्तकार व कामगार वर्गाला केंद्र सरकारच्या जाचक त्रासातून मुक्तता मिळावी,शेतकरी व कामगार वर्गाचे काळे कायदे रद्द व्हावेत यासाठी हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला असून जिल्हाभरात पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने नागरिक स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.यात कास्तकार व मजूर वर्गाने सहभागी होऊन या काळया कृषी बिलाचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी डॉ. कोरपे,मनीष भांबुरकर, अमानकर, ढोके,हेमंत देशमुख,अविनाश देशमुख, वाखारिया आदींनी मार्गदर्शन करीत कृषी बिल हाणून पाडण्याचे आवाहन केले.संचालन हारून शहा यांनी तर आभार सागर कावरे यांनी मानले.राष्ट्रगीताने या सत्याग्रह आंदोलनाचे समापन करण्यात आले. सामाजिक अंतर राखीत संपन्न या किसान अधिकार दिन सत्याग्रहात यावेळी विलास गोतमारे,गणेश कळसकर,राजीव इटोले,अलख राहणे,अनुराग वानरे मोहसिन बेग, राजेश भालतीलक,सुनील वासनकर,मुकुंद सनगाळे,संतोष देशमुख,गणेश ठाकूर,गांधी विद्यालयाचे संचालक रामचंद्र इंगळे, विठ्ठलराव चोपडे समवेत पंचक्रोशीतील कास्तकार,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसAkolaअकोला