शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

निधीच्या गोंधळावर आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

By admin | Updated: April 17, 2017 02:07 IST

पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या पत्रयुद्धात रोखला निधी खर्च

अकोला : जिल्हा परिषदेतील कोट्यवधींचा निधी अखर्चित राहिल्यामुळे विविध विभागांच्या योजनांसह कंत्राटदारांची देयके रोखण्यात आली आहेत.त्यावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी सांगितले. त्यामुळे कंत्राटदारांनी उद्या सोमवारी जिल्हा परिषदेला कुलूप ठोकण्याचा दिलेला इशारा तुर्तास मागे घेण्यात आला आहे.अकोला जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन उद्या सोमवारी जिल्हा परिषदेच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्याचा इशारा दिल्यामुळे हा मुद्दा आणखी ऐरणीवर आला आहे. या परिस्थितीच्या कारणामागच्या शोधात अधिकाऱ्यांच्या कामकाजा बद्दलच शंका उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय आणि पदाधिकारी स्तरावरच्या कामकाजाचा पूर्णत: बोऱ्या वाजल्याचे चित्र आहे. त्यातच बांधकामसह इतरही विभागाच्या योजनांचा निधी परत जाणार असल्याने कंत्राटदारांचा रोष वाढला आहे. तत्परतेमुळे रोखला निधी खर्चजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांच्याकडे गेलेली फाइल कित्येक वेळा तपासल्याशिवाय अंतिम मंजुरी मिळत नाही. त्याचवेळी अर्थ समिती सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या पत्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी तातडीने कार्यवाही करीत मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांना तत्काळ पत्र देण्याची तत्परता दाखविली, त्यामुळे निधी खर्चाचा पेच झाला आहे. वित्त विभागानेही ताणला मुद्दास्थायी, अर्थ समितीला कायद्यानुसार हिशेब सादर न करणे, नियमबाह्यपणे देयक अदा करणे यामध्ये पटाईत असलेल्या वित्त विभागाने या प्रकरणात नियमावर बोट ठेवत हेकेखोरपणाचा कळस केला आहे. त्यामुळेच निधी गेला तर जिल्ह्याचा जाईल, त्यात आपले काय जाणार, अशी भूमिका घेत वाटोळे करण्यात मोठा हातभार लावला. काय आहे पत्रात...सभापती अरबट यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांना दिलेल्या पत्रात कुठेही निधी खर्च थांबवा, असे म्हटलेले नाही. ३१ मार्च अखेरपर्यंत बांधकाम विभागात प्राप्त देयके, त्याच्या आवक-जावकमध्ये असलेल्या नोंदी, त्यापोटी अदा केल्या जाणाऱ्या धनादेशाची नोंदवही, रोकड नोंदवहीच्या शेवटच्या पानाची माहिती त्यांनी मागितली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी देयक थांबविणाऱ्या अर्थाचे पत्र वित्त विभागाला दिल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे उघड होते. त्यामुळे नंतर उद्भवलेल्या वादात देयक अदा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र द्यावे, सभापती अरबट यांनी तक्रार मागे घ्यावी, असा पवित्रा वित्त विभागाने घेतला. या त्रांगड्यात नुकसान झाले ते जिल्ह्याचे. सभापतींच्या पत्रानुसार पत्र देणे क्रमप्राप्त होते. त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण नाही. वित्त विभागाला दिलेल्या त्या पत्राचे अद्याप उत्तर देण्याची तसदीही मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे आपल्या पत्रामुळे निधी खर्च थांबला, असे म्हणता येत नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने पुन्हा लेखी पत्र मागविले नाही. - अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.