शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

दिवाळीपूर्वीच सुरू होणार जिल्हा सहकारी बँका

By admin | Updated: September 22, 2015 02:01 IST

दिवाळीपूर्वीच जिल्हा बँकेला आर्थिक परवाना मिळण्याचे शुभसंकेत; सहकार चळवळीला नवी उभारी येण्याची शक्यता.

बुलडाणा : आर्थिक परवाना मिळविण्यासाठी बुलडाणा जिल्हा बँकेने सर्व बँकिंग प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशा आशयाचे पत्र रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला १८ सप्टेंबरला पाठविले आहे. त्यावर तातडीने कारवाई करीत, जिल्हा बँकेने बँकिंग व्यवहाराची इत्थंभूत माहिती रिझर्व्ह बँकेने दिलेल्या फॉर्मेटमध्ये नाबार्डच्या माध्यमातून पाठविली आहे. या सर्व घडामोडींमुळे दिवाळीपूर्वीच जिल्हा बँकेला आर्थिक परवाना मिळण्याचे शुभसंकेत असून, ही बँक सुरू झाल्यानंतर सहकार चळवळीला नवी उभारी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर आणि वर्धा जिल्हा बँकही ऑक्टोबरपूर्वीच सुरू होण्याची शक्यता यापृष्ठभूमिवर व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर तो परत मिळविण्यासोबतच बॅकेचे पुनरूज्जीवन करण्यासाठीही शासनाने पुढाकार घेतला आहे. नाबार्डसोबत राज्य शासनाने केलेल्या सांमजस्य कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे अडचणीत आलेल्या बँकाना मदतीचा हात मिळाला. बुलडाणा जिल्हा बँकेला राज्य सरकारने १९ जून २0१४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार १२४.0४ कोटी रुपये भागभांडवलाच्या रूपात आर्थिक साहाय्य मिळणार होते. त्यामध्ये वाढ होऊन जिल्हा बँकेला १३७ कोटीची मदत मिळाली आहे. त्यामुळे बँकेचे ७ ट क्के सीआरएआरचे लक्ष्य पूर्ण होणार आहे. आर्थिक कारणांमुळे डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा येथील जिल्हा बँका ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत. शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्ज मिळाले नसले तरी रबीकरि ता कर्ज देण्याची या बँकांची तयारी राहणार आहे. तिन्ही बँकांचे नाबार्डतर्फे ऑडिट करण्यात आले असून, तो अहवाल रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला आहे. आर्थिक परवान्यासाठी रिझर्व्ह बँकेची कारवाई सुरू आहे. कोणत्या बँकेला किती निधी लागेल, हे पाहून राज्य सरकारला त्याची पूर्तता करावी लागणार आहे. एकूण ११४.८२ कोटी रुपये तिन्ही जिल्हा बँकांना अतिरिक्त द्यावे लागतील. यापूर्वी राज्य सरकारने या बँकांना ३८0 कोटी रुपये दिले आहेत. जिल्हा बँका सुरू झाल्यानंतर नाबार्ड दर महिन्याला बँकांचा आढावा घेणार आहे. सध्या त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशासक आहेत. यापुढे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांची सीईओ या पदावर नियुक्ती केली जाईल, तसेच बँकांमधील कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.