शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

अकोल्यात ३०  मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत जिल्हा कृषी महोत्सव

By atul.jaiswal | Updated: March 29, 2018 16:00 IST

अकोला: आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्टया उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील, या करीता शुक्रवार, दिनांक ३०  मार्च ते ३ एप्रिल २०१८ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर, मुर्तिजापुर रोड, अकोला या ठिकाणी भव्य जिल्हा कृषि महोत्सव - २०१८ चे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकृषि महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे.कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतातील उत्पादीत केलेला कृषि माल ग्राहकांना योग्य किंमतीत उपलब्ध होणार आहे.शहरातील ग्राहकांनासुध्दा शेतीवरील स्वच्छ व खात्रीशीर शेतमाल मिळणार आहे.

 अकोला: आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्टया उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील, या करीता शुक्रवार, दिनांक ३०  मार्च ते ३ एप्रिल २०१८ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसर, मुर्तिजापुर रोड, अकोला या ठिकाणी भव्य जिल्हा कृषि महोत्सव - २०१८ चे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व कृषि विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या महोत्सवात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या पध्दतीने शेतमालाची विक्री होणार आहे.         या कृषि महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार संजय धोत्रे  हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा,  प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे, रणधिर सावरकर, बळीराम सिरसकार व गोपीकिशन बाजोरीया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.         जिल्हा कृषि महोत्सवाचे उदेृश हा कृषि विषयक तंत्रज्ञान व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे,शेतकरी शासन आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समूह / गट स्थापित करुन शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साखळी विकसीत करणे हा होय. तसेच कृषि विषयक परिसंवाद आयोजीत करुन शेतक-यांचे समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरेदीदार संम्मेलन आयोजीत करुन बाजाराभिमुख कृषि उत्पादनास चालना देणे असा आहे.       

  जिल्हा कृषि महोत्सवाचे वैशिष्टये

जिल्हयात कृषि आणि पुरक व्यवसायाशी निगडीत एकात्मिक शेती पध्दतीवर आधारीत या पाच दिवसीय कृषि प्रदर्शनात शासनाच्या विविध योजना / उपक्रमांची माहिती देणारे 30 शासकीय दालने, शेतीशी निगडीत खाजगी कंपन्या, उद्योजक, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे एकूण 150 दालने, सेंद्रिय शेतमालाची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री,कृषि शास्त्रज्ञ, कृषि व संलग्न विभागातील तज्ञ अधिकारी, अनुभवी शेतकरी, नामांकित वक्ते यांची व्याख्याने/ चर्चासत्रे, शेतक-यांनी  पिकविलेले धान्य, डाळी, सेंद्रिय माल व इतर शेतमाल थेट शेतक-यांकडून रास्त दरात खरेदीसाठी उपलब्ध, कृषि निविष्ठा, कृषि तंत्रज्ञान व सिंचन इ. यंत्रसामुग्रीचे विविध कंपन्यांचे स्टॉल्स, पशु पक्षी प्रदर्शन, जल साक्षरता ग्राम, गुलाबी बोंड अळींचे व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचे लाईव्ह मॉडेलचे स्टॉल, खरेदीदार - विक्रेता सम्मेलन, गटांमार्फत खाद्य पदार्थांचे स्टॉल्स ही आहेत.        या कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतातील उत्पादीत केलेला कृषि माल ग्राहकांना योग्य किंमतीत उपलब्ध होणार आहे. मध्यस्थांशिवाय शेतमालाची खरेदी- विक्री होत असल्याने शेतकरी व ग्राहक या दोघांनाही याचा फायदा होणार आहे. या माध्यमातुन शेतक-यांना शहरातील कायमचा व हक्काचा ग्राहक मिळणे अपेक्षीत आहे. शहरातील ग्राहकांनासुध्दा शेतीवरील स्वच्छ व खात्रीशीर शेतमाल मिळणार आहे. महोत्सवातील विक्रीची वेळ सकाळी 9.00 ते रात्री 8.00 अशी राहील.       जास्तीत-जास्त शेतकरी व  नागरीकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, प्रकल्प संचालक, आत्मा, सुरेश बाविस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेन्द्र निकम यांनी केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola District Agro Festival 2018अकोला जिल्हा कृषी महोत्सव २०१८