शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

‘जल जीवन मिशन’ च्या जिल्हा कृती आराखड्यास मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 10:34 AM

Akola News कृती आराखड्यात २२७ पाणी पुरवठ्याच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या.

अकोला: जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठा योजनांच्या कृती आराखड्यास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. मंजुरी देण्यात आलेल्या कृती आराखड्यात २२७ पाणी पुरवठ्याच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.एम. गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. टी. शेलार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र चाैधरी, मिलिंद जाधव, कांचन उमाळे, वन विभागाचे आर.ए. ओवे आदी उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबास नळजोडणीव्दारे २०२४ पर्यंत दरडोइ प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के व लोकवर्गणीतून १० टक्के निधी उपलब्ध करावयाचा आहे. त्यानुषंगाने जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा कृती आराखड्यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या २२७ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. प्रस्तावित योजनांच्या कृती आराखड्यास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली.

कृती आराखड्यास प्रस्तावित अशा आहेत योजना!

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा कृती आराखड्यात २२७ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या. त्यामध्ये पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांची रिट्रोफिटींग करणे १५१ योजना, कामे सुरू

असलेल्या पाणी पुरवठा योजनांची रिट्रोफिटींग करणे २० योजना, प्रगतीपथावर असलेल्या ७ योजना व नवीन ४९ योजना इत्यादी पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय