शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

धान्य वाटपाच्या वेळापत्रकाला २५ जिल्ह्यांत ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 2:05 PM

२५ जिल्ह्यांमध्ये शासनाने पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धतीनुसार ठरवून दिलेले वेळापत्रक पाळले जात नाही.

- सदानंद सिरसाटअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला अन्न सुरक्षा दिनानिमित्त प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शासनाने पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धतीनुसार ठरवून दिलेले वेळापत्रक पाळले जात नाही. वाटपाला विलंबामुळे धान्याचा काळाबाजार करण्यालाच त्यातून प्रोत्साहन देण्याचा प्रकार राज्यभरात घडत आहे. विशेष म्हणजे, पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सहा महसूल विभागातील पुरवठा उपायुक्तांना धारेवर धरले आहे.शासनाने २०१२ पासून अन्न दिन व अन्न सप्ताह पाळणे सुरू केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार तशी व्यवस्था निर्माण करणे शासनाला बंधनकारक आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी १८ मे २०१८ रोजी विशेष आदेशही देण्यात आला. त्यामध्ये पुढील महिन्याचे धान्य नियतन आधीच्या महिन्यात १० तारखेपर्यंत प्राप्त करणे, उचल करणे, २० तारखेपर्यंत ते धान्य गोदामात पोहोचणे, तालुक्यातील पुरवठा विभागाने २० तारखेपर्यंत दुकानदारांना परमिट देणे, २१ तारखेपासून दुकानापर्यंत धान्य वाहतूक सुरू करणे, १४ तारखेपर्यंत रास्त भाव दुकानापर्यंत १०० टक्के धान्य पुरवठा करणे, अन्न दिनाच्या दिवशी दरमहा ७ तारखेला व त्यानंतर १५ तारखेपर्यंत लाभार्थींसाठी दुकानात धान्य उपलब्ध करणे, ही पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धत निश्चित झाली. या पद्धतीला यंत्रणेतूनच सुरुंग लावत लाभार्थींचे धान्य काळ्या बाजारात जाण्याचा रस्ता मोकळा केला जात आहे.पुरवठा साखळी व्यवस्थापन पद्धतीनुसार १६ सप्टेंबरपर्यंत राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कमालीची दिरंगाई झाली आहे. काही जिल्ह्यांतील वाटपाची टक्केवारी २० च्या पुढेही गेलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील धान्य वाटपात सुरू असलेल्या गोंधळाची गंभीर दखल पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी घेतली. अमरावती विभागाचे उपायुक्त रमेश मावसकर यांना त्याबाबतचे पत्र देत सुधारणा करण्याचे बजावले. तसे न झाल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

वेळेत शंभर टक्के वाटप न करणारे जिल्हेसिंधुदुर्ग-६३, ठाणे-७३, रायगड-७६, नंदूरबार-६१, जळगाव-६७, नाशिक-७४, हिंगोली-२०, बीड-७३, नांदेड-६३, जालना-७२, परभणी-४९, अमरावती-६३, बुलडाणा-१९, औरंगाबाद-८६, धुळे-८५, पालघर-८७, रत्नागिरी-९१, यवतमाळ-९०, गोंदिया-८९, गडचिरोली-९२ टक्के एवढे धान्य वेळेत पुरवठा झाले.

 

टॅग्स :Akolaअकोला