शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

विकृती वाढली; कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा! - चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:01 IST

राज्यात ३० ते ३५ महिलांचे दररोज शोषण होत आहे. लोकप्रतिनिधी बेताल झाले आहेत. विकृती वाढत असून, त्याला सरकारच खतपाणी घालत आहे, अशा शब्दात राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देअकोल्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत बुथ कमिटीचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. पोलीस यंत्रणाही या सरकारच्या दबावात असल्याने त्यांच्यामधील संवेदनशीलता कमी झाल्याचाही आरोप वाघ यांनी केला.

अकोला : भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून, भाजपाचेच काही आमदार खुलेआम विकृतीला प्रोत्साहन देत आहेत. राम कदम हे त्यांचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. १७ महिन्यात ३ हजार ३०० महिला बेपत्ता आहेत. दिवसाला १२ बलात्कार होतात, राज्यात ३० ते ३५ महिलांचे दररोज शोषण होत आहे. लोकप्रतिनिधी बेताल झाले आहेत. विकृती वाढत असून, त्याला सरकारच खतपाणी घालत आहे, अशा शब्दात राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चित्रा वाघ यांनी विदर्भ दौरा सुरू केला. त्या अंतर्गत गुरुवारी त्यांनी अकोल्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत बुथ कमिटीचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची जंत्रीच दिली. एकीकडे महिलांवर आत्याचार वाढत असताना दुसरीकडे भाजपाचे सरकार मात्र कुठल्याही उपाययोजना करण्यासाठी तत्पर नसल्याचा आरोप त्यांनी केला. कायदे आहेत मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाही. बीड, मुंबईमध्ये भाजपा आमदारांच्या मतदारसंघात घडलेल्या तक्रारीसुद्धा पोलिसांनी घेतल्या नाही. त्यासाठी कोर्टात धाव घेऊन गुन्हे दाखल करण्याचा आदेश आणावा लागला. पोलीस यंत्रणाही या सरकारच्या दबावात असल्याने त्यांच्यामधील संवेदनशीलता कमी झाल्याचाही आरोप वाघ यांनी केला.महिला अत्याचाराच्या विरोधात जागर करतानाच आता या सरकारला आम्ही धडा शिकविणार, असा संकल्प महिला करीत आहेत. राष्ट्रवादी महिला आघाडी त्यासाठी आक्रमक होणार असून, येणाºया निवडणुकीत महिला आघाडीची भूमिका ही प्रभावी राहील, असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगर अध्यक्ष राजू मुलचंदाणी, श्रीकांत पिसे पाटील, आशा मिरगे, रिजवाना शे.अजिज, पदमा अहेरकर, मंदाताई देशमुख, दिलीप आसरे, रमेश हिंगणकर आदी उपस्थित होते.बॉक्स...गृहमंत्री संरक्षण करण्यास असक्षमराज्याला मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असून, त्यांना दोन राज्यमंत्री आहेत मात्र हे दोन्ही राज्यमंत्री कधीही पीडित महिलांना धीर देताना दिसले नाहीत. महिलांना कायद्याचे संरक्षण देऊन त्यांना धीर देण्याचे काम यांनी कधीच केले नाही. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात उपयायोजना करण्यास हे कुचकामी ठरल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसChitra Waghचित्रा वाघ