शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतकरी व्यापा-यांमध्ये वाद

By admin | Updated: February 12, 2015 01:18 IST

अकोल्यात खरेदी थांबविल्याने शेतक-यांचे नुकसान.

अकोला: व्यापारी व खरीददारांच्या आडमुठय़ा धोरणामुळे बुधवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये वाद झाला. व्यापार्‍यांनी खरेदी बंद केल्यामुळे शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे बाजार समिती परिसरात पाणी साचले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल पोत्यांमध्ये ठेवून त्यांची पाहणी व्यापारी करतात. माल बघितल्यावर व्यापारी खरेदी करीत होते. मात्र, गत काही दिवसांपासून शेतमाल पूर्ण जमिनीवर टाकून खरेदी केली जात आहे. यामध्ये शेतकर्‍यांना फायदा होत आहे. मंगळवारी रात्री पाऊस आल्यामुळे बाजार समितीत पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीददारांना शेतमाल जमिनीवर न टाकता पोत्यातून माल पाहून खरेदी करण्याची विनंती केली. मात्र, व्यापार्‍यांनी शेतमाल जमिनीवर टाकून नंतरच त्याची खरेदी करणार असल्याचे सांगितले. त्यावर आणखी दोन दिवस पावसाची शक्यता असून, जमीनही ओली आहे. शेतमाल जमिनीवर टाकला तर त्याची प्रत घसरेल. त्यामुळे पोत्यातील मालाचीच खरेदी करण्याची विनंती शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना केली. मात्र, व्यापार्‍यांनी जमिनीवर माल टाकल्याशिवाय खरेदी करणारच नाही, असे धोरण ठरविले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये वादही झाला. मात्र, व्यापार्‍यांनी माल खरेदी करण्यास नकार दिल्यामुळे बुधवारी खरेदी बंद होती. शेतकर्‍यांचा शेतमाल बाजार समितीत पडून आहे. गुरुवारी पाऊस झाला तर शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.