शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

कपाशीवर येतोय मर रोग; शेतकऱ्यांची चिंता वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:58 IST

अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.पश्चिम विदर्भातील कपाशी प्रमुख पीक असून, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात खरीप पीक म्हणून कपाशी लागवड करण्यात येते; परंतु खान्देश, मराठवाडा तसेच विदर्भातील अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील सिंचनाची सोय आहे. तेथे पूर्वमान्सून कपाशीची लागवड मे महिन्यात करण्यात येते. यावर्षी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शासनाने २० मे पासून बीटी बियाणे विक्री सुरू केली असली, तरी बहुतांश ठिकाणी याअगोदर बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. कपाशीच्या बीटी वाणाची लागवड ही साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या २ ते ३ इंच पाऊस झालेला असेल, अशा वेळेस करावी लागते; पण ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्था होती, त्यांनी बीटी कपाशीची मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर पिकांच्या जोमदार वाढीसाठी रासायनिक खत, कीटकनाशके आणि वाढ नियंत्रकाचा अतिवापर करण्यात येत असल्याने या परिस्थितीत मे महिन्यात वाढलेले तापमान तसेच पिकाला ठिबक किंवा इतर माध्यमाने करण्यात आलेले ओलीत यामुळे जमिनीतील तापमानात होणारा सतत बदल व दिवसाच्या शुष्क वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी तसेच सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात जर पावसाचा खंड पडला आणि लगेच पाऊस आल्यास कपाशीवर विपरीत परिणाम होऊन ते आकस्मिक मर रोगाला बळी पडते; पण यावर्षी आताच मर रोगाच्या प्रादुर्भावाचे लक्षण कपाशीवर दिसत असून, कपाशी पीक निस्तेज दिसत असल्याच्या तक्रारी शेतकºयांमधून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी