शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कपाशीवर येतोय मर रोग; शेतकऱ्यांची चिंता वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:58 IST

अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.पश्चिम विदर्भातील कपाशी प्रमुख पीक असून, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात खरीप पीक म्हणून कपाशी लागवड करण्यात येते; परंतु खान्देश, मराठवाडा तसेच विदर्भातील अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील सिंचनाची सोय आहे. तेथे पूर्वमान्सून कपाशीची लागवड मे महिन्यात करण्यात येते. यावर्षी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शासनाने २० मे पासून बीटी बियाणे विक्री सुरू केली असली, तरी बहुतांश ठिकाणी याअगोदर बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. कपाशीच्या बीटी वाणाची लागवड ही साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या २ ते ३ इंच पाऊस झालेला असेल, अशा वेळेस करावी लागते; पण ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्था होती, त्यांनी बीटी कपाशीची मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर पिकांच्या जोमदार वाढीसाठी रासायनिक खत, कीटकनाशके आणि वाढ नियंत्रकाचा अतिवापर करण्यात येत असल्याने या परिस्थितीत मे महिन्यात वाढलेले तापमान तसेच पिकाला ठिबक किंवा इतर माध्यमाने करण्यात आलेले ओलीत यामुळे जमिनीतील तापमानात होणारा सतत बदल व दिवसाच्या शुष्क वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी तसेच सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात जर पावसाचा खंड पडला आणि लगेच पाऊस आल्यास कपाशीवर विपरीत परिणाम होऊन ते आकस्मिक मर रोगाला बळी पडते; पण यावर्षी आताच मर रोगाच्या प्रादुर्भावाचे लक्षण कपाशीवर दिसत असून, कपाशी पीक निस्तेज दिसत असल्याच्या तक्रारी शेतकºयांमधून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी