शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘एनडीआरएफ’च्या पथकाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:10 IST

अकोला : नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीत जिवीत हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत मंगळवार, १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्दे१३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली.एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) पथकातील अधिकारी व जवानांनी उपस्थिताना यावेळी मार्गदर्शन केले. आॅयल डेपोचे कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, एनएसएस व एनसीसीचे विदयार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अकोला : नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीत जिवीत हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत मंगळवार, १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली.एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) पथकातील अधिकारी व जवानांनी उपस्थिताना यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसिलदार राजेश्वर हांडे, मुख्य अग्नीशमन अधिकारी ठाकरे, एनडीआरएफ टीम कंमाडर जे. मुरमू, मनिषकुमार, श्री. मोरे, बी.एन. नवले व जवान उपस्थित होते. प्रास्ताविक व उदघाटनपर भाषण देशपांडे यांनी केले.यावेळी जे. मुरमू यांनी एनडीआरएफ बद्दल माहिती दिली. केंद्र सरकारने विशेष नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती हातळण्यासाठी हे पथक तयार केलं आहे. एनडीआरएफ हे पूर, भूकंप, त्सुनामी, वादळ यासारख्या नैसर्गिक संकटांसोबतच, न्यूक्लिअर रेडिएशन, केमिकल लिकेज, इमारत कोसळणे किंवा ढिगाºयाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, यांसारख्या संकटांचा कौशल्याने सामना करते. अशा संकटात सापडलेल्या लोकांना मदत करते. कोणत्याही आपत्तीचा कौशल्याने सामना करण्यासाठीच एनडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये जवानांना पूर, भूंकप, वादळ, त्सुनामी आदी आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना कशी मदत करायची, वैद्यकीय सुविधा, हवाई प्रशिक्षण, डॉग स्कॉड हाताळणे, शोध आणि बचावकार्य आदींचं प्रशिक्षण दिलं जातं. देशात एनडीआरएफची पथके १० ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी एनडीआरएफचे पथक आहे.एनडीआरएफ पथकाचे जवान श्री. कृष्णा यांनी प्रात्यक्षिकासह विविध आपत्तीतून कसा बचाव करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भूकंप, उंच इमारती पासून बचाव, चक्रीवादळ, पूर, आग, अपघात यासह मानव निर्मित आपत्तीत प्रसंगावधान राखून आपत्तीत सापडलेल्या लोकांचा कशाप्रकारे बचाव करावा तसेच घटनास्थळी उपलब्ध साहित्याच्या मदतीने कशाप्रकारे प्रथमोपचार करावा, याबाबतची माहिती त्यांनी दिली.सूत्रसंचालन नायब तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी केले. तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी आभार मानले. यावेळी तलाठी, होमगार्ड, ग्रामसेवक, अग्नीशमन दलाचे कर्मचारी, आरोग्य, पाणी पुरवठा, कृषी विभागाचे कर्मचारी, गायगाव येथील आॅयल डेपोचे कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, एनएसएस व एनसीसीचे विदयार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय