शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:56 IST

देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जेवढी अस्वस्थता मुस्लीम समुदायामध्ये आहे, तेवढीच हिंदू समाजामध्ये आहे. देशातील ६ हजार ७०० जातींच्या रहिवासाचे मूळ पुरावेच कधी चातुर्वर्ण्य व्यवस्थेने निर्माण होऊ दिले नाहीत. देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते पातूर येथे गोंधनी मैदानावर हिंदू-मुस्लीम तथा सर्व जनसमुदायाच्या तीने आयोजित जन आक्रोश सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी काझी मो. सरफराझ होते.यावेळी पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, आम्ही सर्व संविधानासोबत आहोत. आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार मोदी-शाह यांना नाही. आपला देश स्वतंत्र आहे. गांधींनी स्वातंत्र्य दिले; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मानवता दिली. संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही. मनु तुम्हाला नेहमीच पायाखाली ठेवतो, बरं झालं आम्हाला या कायद्यामुळे जात व्यवस्था कळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुरून टाकलेल्या मनुवादी व्यवस्थेचा पुनर्जन्म करण्याचा घाट घातला जातो. जिथे मनु दिसेल, तिथे जाळून टाकू. आता हिंदू-मुसलमानांसह सर्वांचा देशासाठी लढा सुरू झाला, असेही आव्हाड म्हणाले.मंचावर अ. रशिद, मुफ्ती अशपाक, काझी तौसिफ, मौलाना वसिऊल्ला, यासिनखान, हाफिज आरिफरजा, अ. करीम बज्मी, अ‍ॅड. काझी अहमद अली, माजी नगराध्यक्ष हिदायत खान रूमखा, माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुºहान, पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर, पातूर न.प. उपाध्यक्ष सै. मुजाहिद सै. मोहसिन, माजी सरपंच दीपक इंगळे, शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे, बामसेफचे अमोल इंगळे, निर्भय पोहरे, मनोहर खंडारे, दिनेश पोहरे व मो. मेहताब अ. रऊफ उपस्थित होते. संचालन प्रा. समशेर उलहक, नदिम शाह यांनी केले. आभार आरिफ उर्ररहमान यांनी मानले. सभेला पातूर शहर आणि तालुक्यातील हिंदू-मुस्लीम तथा सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी