शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

कला व क्रीडा शिक्षणापासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: May 22, 2015 01:49 IST

५ हजार ५0५ अंशकालीन शिक्षकांची पदे रिक्त

प्रवीण खेते / अकोला : शासनाने उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, आरोग्य आणि कार्य शिक्षण विषयासाठी अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक केल्यावर या भरतीला शिक्षक संघटनांनी विरोध केला. त्यामुळे भरतीला स्थगिती देण्यात आल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांंना सर्वांंगीण विकासाच्या विषयापासून मुकावे लागणार आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारान्वये उच्च प्राथमिक शाळांमध्ये १00 विद्यार्थ्यांमागे कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्य शिक्षण (कार्यानुभव) विषयासाठी अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले. त्या अनुषंगाने राज्य शासनाने ऑगस्ट २0१४ मध्ये परिपत्रक काढून काही वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. परंतु, या परिपत्रकाला व पद भरतीला कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघटनांनी विरोध केला. खासगी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद, महानगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा दर्जा खालावला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी मध्यम कुटुंबातील असून, यात मोठी संख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आहे. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाचे हे निर्णय कागदोपत्री चांगले दिसत असले तरी, वास्तवात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. राज्य शासनाने २१ ऑगस्ट २0१४ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्य शिक्षण (कार्यानुभव) विषयाच्या अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्याबाबत परिपत्रक काढले होते. यामध्ये ३0 सप्टेंबर २0१३ च्या युडाईस अहवालानुसार १ हजार ८३५ शाळांमधील ५ हजार ५0५ अंशकालीन निदेशक पदांना मंजुरी दिली. या परिपत्रकानुसार राज्यभरात १0 नोव्हेंबर २0१४ रोजी अंशकालीन निदेशक पदाची परीक्षा घेण्यात आली. परंतु, पूर्वीच्या अर्धवेळ निदेशकांना कायमस्वरूपी करण्याची मागणी अंशकालीन निदेशक संघटनांनी केली. त्यामुळे या पदभरतीला न्यायालयाने स्थगिती दिली. तेव्हापासून ही पदे अद्यापही रिक्त असल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे.