शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्रामच्या बक्षिसांनी रोखला डिजिटल इंडियाचा मार्ग

By admin | Updated: July 17, 2017 03:20 IST

जिल्हा परिषदेने स्मरणपत्र देत केली निधीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्मार्ट ग्राम योजनेतील तालुका आणि जिल्हा स्तरावर बक्षीस वितरणासाठी शासनाकडून सात महिन्यानंतरही निधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने शासनाला स्मरणपत्र देत निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेकडे प्राप्त ३४ लाख रुपये वाटपासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेला निधी मिळाल्याशिवाय हा निधी मुक्त होत नसल्याचीही अडचण आहे. केंद्र शासनाकडून ‘डिजिटल इंडिया’चे ढोल बडवले जात असताना त्यासाठी तयार असलेल्या ग्रामपंचायतींना बक्षिसांची रक्कम न देण्याचा करंटेपणाही केला जात असल्याचे चित्र आहे.स्मार्ट ग्राम योजनेची सुरुवात डिसेंबर २०१६ पासून झाली. त्यामध्ये सहभागी गावांची तालुका स्तरावर निवड करण्यात आली. त्या गावांना २६ जानेवारी रोजीच बक्षीस वितरण करण्याचे ठरले होते; मात्र निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे बक्षीस वितरण पुढे ढकलले. त्यानंतर जिल्हास्तरीय गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच १ मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम बक्षीस वितरणासाठी निश्चित झाला. या कार्यक्रमात संंबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना रोख बक्षिसांसह प्रमाणपत्र वितरण करण्याचे शासनाने आधीच बजावले होते. त्याचवेळी राज्यात १०४ कोटींची गरज असताना त्यातील केवळ दहा कोटी ५६ लाख रुपयेच शासनाने दिले. त्यामुळे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले. आधीचे पाच आणि त्यानंतर तीन महिने उलटले तरीही बक्षिसांची रक्कम जिल्हा परिषदांना मिळालेली नाही. प्रथम गावाला १० ते ४० लाखांचे रोख बक्षीस शासनाने स्मार्ट ग्राम योजनेत ग्रामपंचायतींना बक्षिसांची रक्कमही ठरवून दिली. त्यामध्ये तालुक्यातून प्रथम ग्रामपंचायतींना १० लाख रुपये, तर जिल्हा स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये रोख बक्षीस दिले जाते. निधीसाठी सातत्याने मागणीग्रामपंचायतींची निवड करून त्यांना २६ जानेवारी रोजी बक्षीस वितरणाचेही ठरले आहे; मात्र आचारसंहितेमुळे बक्षीस वितरण लांबले. त्यानंतर १ मे महाराष्ट्र दिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देण्याचे ठरले असतानाही त्यासाठी निधी देण्यात शासनानेच हात आखडता घेतला. बक्षिसांसाठी ७० लाख रुपये निधीच मिळत नसल्याने जिल्हा परिषदांना त्याबाबत सातत्याने शासनाला स्मरणपत्र देत मागणी करावी लागत आहे.स्मार्ट गावे तालुका स्मार्ट ग्राममध्ये अकोला तालुक्यातील म्हातोडी, बाळापूर- खिरपुरी बुद्रूक, पातूर- बेलुरा बुद्रूक, बार्शीटाकळी-धाबा, मूर्तिजापूर-जितापूर खेडकर, अकोट-धारेल, तेल्हारा- खापरखेड ही गावे १० लाखांच्या बक्षिसासाठी पात्र आहेत. निधीच नसल्याने जिल्हा स्तरावर निवड प्रक्रियेबाबतही माहिती उपलब्ध नाही.