शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सत्तेसाठी धनगर समाजाने संघटित व्हावे -अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:03 IST

अकोला: महाराष्ट्रातच नव्हे, तर जिल्ह्यात धनगर समाज बहुसंख्य असूनसुद्धा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आरक्षण, सत्तेपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगर समाजाने आता जागरूक आणि संघटित झाले पाहिजे, असे मत प्रा. अंजली आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

अकोला: महाराष्ट्रातच नव्हे, तर जिल्ह्यात धनगर समाज बहुसंख्य असूनसुद्धा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आरक्षण, सत्तेपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगर समाजाने आता जागरूक आणि संघटित झाले पाहिजे, असे मत प्रा. अंजली आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.धनगर समाज संघटनेच्यावतीने आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन विकास आघाडीचे राज्य नेते माजी आमदार हरिदास भदे होते.प्रमुख अतिथी म्हणून लातूर लोकसभेचे उमेदवार राम गारकर, आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, नाशिकचे विनायकराव काळदाते, बळीराम चिकटे, अ‍ॅड. संतोष रहाटे, वसंतराव मुरळ, दिनकरराव पातोंड, नारायणराव ढवळे गुरुजी, श्रीकृष्ण जुमडे, रमेश उभे गुरुजी, देवानंद नवलकार, रमेश पाली, बंडूभाऊ भदे, वसंतराव भदे, गजानन दोड, जि. प. सभापती देवका पातोंड, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, बाळापूर पं. स. सभापती मंगला तितूर, लीला गावंडे, पुष्पा गुलवाडे, उषा मुरळ, दीपा भदे व उज्ज्वला जुमडे उपस्थित होते.प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या, सत्तेपासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याची उत्तम संधी आहे. बहुजन समाजाला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठीच अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीची मोट बांधली आहे. सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून धनगर समाजाने वादळ निर्माण केले आहे. हे वादळ लोकसभेपर्यंत पोहोचले पाहिजे, असे यावेळी सांगितले.माजी आ. हरिदास भदे यांनी ज्यांना आरक्षणाची गरज नव्हती, त्यांना भाजप सरकारने आरक्षण दिले आणि धनगर समाज अनेक वर्षांपासून आरक्षण मागत असूनही आरक्षण मिळत नाही. प्रस्थापित व सत्ताधाºयांना आमची केवळ मते हवी आहेत, हे आता धनगर समाजाने लक्षात घेऊन आपले धोरण ठरविण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. त्यावेळी आमदार बळीराम सिरस्कार यांनीसुद्धा बहुजन समाजाने संघटित होऊन आपली ताकद दाखवावी, असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन दिनकर नागे यांनी केले. आभार मोहन रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज करणकार, अभिजित नवलकार, अमोल भदे, गजानन वसतकार, श्रीकांत चिकटे, संतोष कात्रे, सचिन बचे, चंदू बोरसे, संदीप जुमडे, बंडू बोळे, प्रज्योत नागे व विजय पुंडे यांनी प्रयत्न केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDhangar Reservationधनगर आरक्षणBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ