शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२५0 कोटींच्या विकास आराखड्याला ग्रहण!

By admin | Updated: March 7, 2017 02:31 IST

मनपाला जमा करावा लागेल ५0 कोटींचा हिस्सा

आशिष गावंडे अकोला, दि. ६- महापालिका क्षेत्रात समाविष्ठ झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी शिवसेना वगळता सत्ताधारी भाजपसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी २५0 कोटींच्या प्रस्तावाला ४ जानेवारी रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली होती. प्रशासनाचा ठराव शासनाने मंजूर केल्यास २५0 कोटींमध्ये २0 टक्क्यानुसार ५0 कोटी रुपये हिस्सा पालिकेला जमा करावा लागेल. मनपाची आर्थिक क्षमता पाहता नवीन प्रभागाच्या विकास आराखड्याला ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत. शहर हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव महापालिकेच्या वतीने २00२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला होता. मनपा प्रशासनाद्वारे उपलब्ध सोयी- सुविधांवर शहरालगतच्या गावांचा ताण पडत असल्यामुळे शहराची हद्दवाढ करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. मनपा प्रशासनानेदेखील हद्दवाढीच्या प्रस्तावाला शासन दरबारी रेटून धरले. परिणामी ३0 ऑगस्ट २0१६ रोजी शासनाने मनपा क्षेत्राच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी करीत १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपामध्ये समावेश केला. नवीन प्रभागात प्रशस्त रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठय़ाची सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे मध्यंतरी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी विकास कामांसाठी २५४ कोटींचा आराखडा मनपाकडे सादर केला होता. नवीन प्रभागांमध्ये विकास कामांची निकड लक्षात घेता मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने टिप्पणी तयार करून ४ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत सादर केली होती. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी शहरात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागाच्या विकासासाठी २५0 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मांडला असता मित्र पक्ष शिवसेना वगळता इतर सर्व राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी प्रस्तावाचे सर्मथन केले होते. लोकप्रतिनिधींवर भिस्त!हद्दवाढीनंतर मनपात सामील झालेल्या भागात विकास कामांसाठी शासनाकडून विशेष अनुदान प्राप्त होते. प्रशासनाने २५0 कोटींचा ठराव शासनाकडे पाठविल्यास त्यामध्ये २0 टक्के रकमेच्या अटीनुसार ५0 कोटींचा हिस्सा जमा करावा लागेल. शासनाकडून प्राप्त अनुदानात वाढ करून घेण्यासह मनपाचा हिस्सा कसा वगळता येईल, यासाठी स्थानिक आमदारांना शासन दरबारी पुढाकार घ्यावा लागणार आहे.सत्ताधारी-प्रशासनात हवा समन्वयशहर विकासासाठी शासनाकडून पुन्हा एकदा निधीचा ओघ सुरू होण्याची चिन्हे आहेत. दज्रेदार कामे पूर्ण करण्यासाठी मनपातील सत्ताधारी व प्रशासनामध्ये समन्वय असावा, अशी अकोलेकरांची अपेक्षा आहे.स्वत: तयार केले नकाशे!आमदार रणधीर सावरकर मूळचे अभियंता आहेत. त्यांनी स्वत: मनपात सामील २४ गावांचे नकाशे तयार करून विकास आराखडा मनपाकडे सादर केला आहे. त्यामध्ये मुख्य रस्त्यांसह प्रत्येक गल्लीबोळांची लांबी-रुंदी किती, त्यावर अपेक्षित पथदिव्यांची संख्या, जलवाहिनीचे जाळे, स्मशानभूमीची जागा, नागरिकांसाठी ह्यओपन स्पेसह्ण, मुलांसाठी खेळाची मैदाने या सर्व बाबींचा अंतर्भाव केल्याची माहिती आहे.