शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विकास मंडळांना मुदतवाढीसह विदर्भासाठी हव्या दोन उप-समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:15 IST

पूर्व विदर्भ अर्थात नागपूर विभाग व पश्चिम विदर्भ अर्थात अमरावती विभाग अशा दोन उपसमिती गठीत कराव्या, अशी मागणीही डॉ.खडक्कार यांनी पत्रातून केली आहे.

अकोला : महाराष्ट्रातील विभागांमधील असमतोल दूर करून समतोल विकास साधण्यासाठी १९९४ साली स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली असून, मुतदवाढ न मिळाल्याने या मंडळांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रात अजुनही विकासाचा समतोल साधलेला नाही. विदर्भ व मराठवाड्यात विकासाचा अनुशेष अजूनही भरलेला नसल्याच्या पृष्ठभूमीवर राज्यातील विकास मंडळाना मुदतवाढ देण्याची तसेच विदर्भातील पूर्व व पश्चिम विदर्भ या दोन विभागांसाठी प्रत्येकी एक अशा दोन उप-समिती गठीत कराव्या, अशी मागणी विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.विदर्भ आणि मराठवाड्याचा जो अनुशेष गणला जातो, तो १९९४ या वर्षातला आहे. त्यानंतर विविध विभागांमध्ये, विविध विकास क्षेत्रात किती व कसा विकास झाला, हे मोजण्यात आले नाही. विदर्भ व मराठवाड्यासारख्या अविकसीत विभागांना आपल्या अनुशेषाबाबतची व्यथा मांडण्यासाठी विकास मंडळे हे एकमेव व्यासपीठ असल्याचा तर्क देत अशा मंडळांना मुदतवाढ मिळण्याची गरज डॉ. खडक्कार यांनी आपल्या पत्रातून अधोरेखित केली आहे.शासनाने ५ सप्टेंबर २०११ रोजी विकासमंडळांबाबत सुधारित शासन निर्णय काढून केवळ उर्वरित महाराष्ट्रासाठी पुणे, नाशिक व कोकण या विभागांसाठी प्रत्येकी एक अशा तीन उपसमिती स्थापन केल्या. या उपसमिती विकास मंडळांप्रमाणेच काम करतात. मराठवाडा व विदर्भातील विभागांसाठी मात्र अशी व्यवस्था करण्यात आली नाही. विदर्भातील पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भातही विकासाचा असमतोल प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो. हा समतोल साधण्यासाठी उर्वरित महाराष्ट्रा प्रमाणेच विदर्भातील पूर्व विदर्भ अर्थात नागपूर विभाग व पश्चिम विदर्भ अर्थात अमरावती विभाग अशा दोन उपसमिती गठीत कराव्या, अशी मागणीही डॉ.खडक्कार यांनी पत्रातून केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाVidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळ