शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात १११ जलमार्ग विकसित करणार- गडकरी

By admin | Updated: April 5, 2016 01:34 IST

वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.

वाशिम : देशात सध्या रस्ते, रेल्वेच्या मार्गानेच वाहतूक करण्यात येते. ही वाहतूक खर्चिक असून, यापेक्षा कितीतरी पटीने जलवाहतूक स्वस्त आहे. म्हणूनच विकसित देशांमध्ये जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. याच उद्देशाने भारतातही १११ नद्यांना जलमार्ग म्हणून विकसित करण्याचा संकल्प सरकारने सोडला असून, त्याकरिता एक लाख कोटी रुपयांची तरतूद करून करण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा सोमवारी वाशिम येथे आयोजित वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील ६७९१ कोटी रुपयांचे रस्ते, उड्डाणपूल विकास कामांच्या कोनशिला अनावरणप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.शेतकर्‍यांना संकटांचा सामना करावा लागत असून, शेतमालाचे उत्पादन घटत आहे. शेतीला पाणी मिळत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास शक्यच नाही, असे स्पष्ट करून, पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. देशातील १११ नद्यांना जलमार्ग म्हणून विकसित करण्यास लोकसभेने मान्यता दिली असून, त्यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील २0 नद्यांच्या बाजूला वॉटर प्लँट विकसित करावयाचा असून, येथे पर्यटन विकसीत होऊ शकेल. या नद्यांमध्ये वर्षभर तीन मीटर पाणी राहिल, असे तंत्रज्ञान विकसित केले जाईल. जलवाहतुकीमुळे वाहतुकीच्या खर्चात मोठी बचत होईल. रस्ते, रेल्वे यापेक्षाही जलवाहतूक स्वस्त व सुलभ आहे. परदेशात जवळपास ४0 टक्के प्रवासी आणि माल वाहतूक पाण्यातून होते. भारतात हे प्रमाण केवळ ३.५ टक्के असून, ते वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, खा. राजीव सातव, खा. संजय धोत्रे, खा. प्रतापराव जाधव, आमदार राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. श्रीकांत देशपांडे, आ. अमित झनक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. खासदारांची कोपरखळीसेना-भाजपच्या ताणलेल्या संबंधांचा धागा पकडत, काँग्रेसचे खासदार राजीव सातव म्हणाले, आम्ही १५ वर्षे सत्तेत होतो, आता विरोधकांची भूमिका कशी पार पाडावी, हे शिवसेनेकडून शिकायला मिळत आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, विरोधकाची भूमिका काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यात ठासून भरली आहे. काँग्रेसमध्ये एका नेत्याचा दुसर्‍या नेत्याला हमखास विरोध असतो. काँग्रेसमध्ये एकमेकांनाच विरोध करण्याचे प्रमाण जास्त असल्याने, त्यांना विरोधकाची भूमिका शिवसेना शिकवूच शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.