शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

निकृष्ट ज्वारीचा प्रश्न विधिमंडळात गाजणार!

By admin | Updated: March 16, 2017 02:34 IST

रणधीर सावरकर यांची लक्षवेधी.

अकोला, दि. १५- शासकीय धान्य गोदामांमध्ये गत वर्षभरापासून पडून असलेल्या निकृष्ट ज्वारीचे जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना वाटप सुरू करण्यात आले आहे. यासंबंधी आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारी वाटपाचा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमीदराने ज्वारी खरेदी करण्यात आली होती. अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने, हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले. वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर शासकीय धान्य गोदामांमधील ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश गत १ डिसेंबर रोजी शासनामार्फत देण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत गत २ फेब्रुवारीपासून एक रुपया प्रतिकिलो दराने रास्त भाव दुकानांमधून जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना पीठ झालेल्या निकृष्ट ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले. टोकरलेली आणि निकृष्ट ज्वारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हय़ातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारली जात आहे. यासंदर्भात गत ११ फेब्रुवारी रोजी ह्यलोकमतह्णमध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत जिल्हय़ातील गरीब शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारी वितरणाचा प्रश्न आमदार रणधीर सावरकर यांनी ह्यलक्षवेधीह्णद्वारे विधिमंडळात दाखल केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ातील निकृष्ट ज्वारी वितरणाचा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.जिल्हय़ात गरीब शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारीचे वितरण करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर विधिमंडळाकडे लक्षवेधी दाखल केली आहे. या प्रश्नावर विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात चर्चा होणार आहे. चर्चेत हा प्रश्न लावून धरणार आहे.-रणधीर सावरकर, आमदार.