शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मानाच्या राजराजेश्वर पालखीचे गांधीग्राम येथून अकोल्याकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 01:30 IST

हर्र बोला महादेव च्या गजरात शिवभक्त गांधीग्राम येथून रवाना झाले.

लाेकमत न्यूज नेटर्वकअकाेला: लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोलेकरांचा लोकोत्सव...महाराष्ट्रातील एकमेव कावडयात्रा महोत्सव...यंदा दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी कावडसह पालखी यात्रा निघणार आहे. कावड यात्रेच्या स्वागतासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज झाली असून, सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनासुद्धा कावड यात्रेतील शिवभक्तांच्या स्वागतासाठी उत्साहीत दिसून येत आहेत. दरम्यान, गांधीग्रामच्या पूर्णा नदीकाठी रविवारी रात्री १२ वाजता मानाच्या राजराजेश्वर कावड पालखीतील शिवभक्तांनी आरती केली़  त्यानंतर माेर्णेच्या पात्रातील जल भरण्यात भरून पालखीने अकाेल्यातील राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी प्रस्थान केले़

     दोन वर्षे कोरोनामुळे शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कावड यात्रेवर प्रतिबंध घालण्यात आला होता. केवळ राजेश्वराची पालखी काढून ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर शहरात कावड उत्सव होणार असल्याने, शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील शेकडो शिवभक्त मंडळांचे कार्यकर्ते भरण्यांची कावड तयार करून गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर जल आणण्यासाठी रविवारी दुपारीच रवाना झाले होते.    सोमवारी पहाटेपासून या कावडी शहराकडे मार्गक्रमण करतील. कावड यात्रेमुळे शिवभक्त उत्साहित झाले असून, कावडीसह पालखीवर वेगवेगळे व आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत.  अकोल्यातील कावड यात्रा ही महाराष्ट्रातील एकमेव आणि ७७ वर्षांची परंपरा असलेली कावड यात्रा आहे. या कावड यात्रेच्या दृष्टिकोनातून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संस्था, संघटना स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. शहरातील प्रमुख चौक व कावड मार्गाला भगव्या पताकांसह स्वागत कमानींनी सजविण्यात आले आहे.

दुष्काळ, पाऊस अन् कावडची परंपरा१९४४ साली अकोला जिल्ह्यात दुष्काळ पडला. सर्वत्र हाहाकार उडाला. श्रावण महिना होता तो. यादरम्यान पाऊस येण्यासाठी शिवाजी नगरातील काही शिवभक्तांनी मातीचे शिवलिंग घडविले आणि त्याची पूजाअर्चा सुरू केली आणि अकोल्यात धो-धो पाऊस बरसला. मोर्णेला पूर आला. अकोलेकरांसह शेतकरी आनंदित झाले. राजराजेश्वराने कौल दिला आणि त्या वर्षांपासून अकोल्यात कावडसह पालखी यात्रा महोत्सव सुरू झाला.

कावड यात्रेला ७७ वर्षांची परंपरा शहराचे सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख असलेला कावड यात्रा महोत्सवाला ७७ वर्षांची परंंपरा आहे.  १९४४ सालापासून अकोल्यातील शिवभक्त मंडळे गांधीग्राम येथे भरण्यांची कावड तयार करून पूर्णा नदीचे जल आणतात आणि राजेश्वराला जलाभिषेक करतात.

-----------

टॅग्स :Akolaअकोला