शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मोहाळी नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी

By admin | Updated: June 16, 2014 12:34 IST

मोहाळी नदीवरील पुलाची उंची फार कमी असल्यामुळे पुराचे पाणी पुलावरून चार ते पाच फूट उंच वाहते. त्यामुळे हा मार्ग नेहमीच बंद पडतो. अशा स्थितीत या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.

 

 
आकोट : आकोट-हिवरखेड राज्य मार्गावर शहरापासून जवळपास १ कि.मी. अंतरावर वाहणारी मोहाळी नदी पावसाळ्याच्या दिवसात भरभरून वाहते. या नदीवरील पुलाची उंची फार कमी असल्यामुळे पुराचे पाणी पुलावरून चार ते पाच फूट उंच वाहते. त्यामुळे हा मार्ग नेहमीच बंद पडतो. अशा स्थितीत या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देत संबंधित विभागाकडून काम करून घेण्याची मागणी होत आहे. 
नदीलगत नगरपरिषदेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. गतवर्षी केंद्राच्या परिसरात पुराचे पाणी शिरले होते. पुरामुळे कित्येक तास वाहतूक खोळंबत असल्याचा आजवरच्या अनेक पावसाळ्यातील अनुभव आहे. या नदीवरून जाण्या-येण्याकरिता पर्यायी मार्ग नसल्यामुळे पादचार्‍यांनासुद्धा कित्येक तास पुराचे पाणी उतरेपर्यंत वाट पाहावी लागते. वैद्यकीय उपचारासाठी व शिक्षणाकरिता येणार्‍यांची चांगलीच परवड होते. आकोट मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने नागरिकांचीसुद्धा मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. पावसाळ्यात पुरामुळे तासन्तास वाहतूक खोळंबण्याच्या प्रकाराने प्रचंड प्रमाणात इंधनाचा व वेळेचा अपव्यय होतो.आकोट शहर व ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आकोट-हिवरखेड मार्गावरील या पुलाची नव्याने निर्मिती करून उंची वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे आकोट सार्वजनिक बांधकाम विभागाने पुराच्या पाण्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये याकरिता तातडीने नदीमध्ये वाढलेली बेशरमची झाडे तसेच नदीपात्रात साचलेला गाळ काढून खोलीकरण व सरळीकरण करणे आवश्यक आहे.
मोहाळी नदीवरील पूल बांधण्याकरिता तीन वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले; परंतु शासनाच्या बजेटमध्ये अद्याप पावेतो पुलाच्या कामाला मंजुरात मिळाली नाही, असे सा. बां. विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर होणारा त्रास लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी ही समस्या मार्गी लावावी. (तालुका प्रतिनिधी)