शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मातीच्या पणत्यांची मागणी घटली!

By admin | Updated: October 21, 2014 23:03 IST

टेराकोटाच्या पणत्यांकडे ग्राहकांचा कल; परराज्यातील पणत्यांची कुंभारांकडून विक्री.

वाशिम: दिपोत्सवात मातीच्या पणत्यांना महत्वाचे स्थान असते. काळाच्या ओघात या पणत्यांचे महत्व ओसरले आहे. मातीच्या पणत्यांची मागणी कमी होत असल्याने, पणत्या बनविणार्‍या कुंभारांची संख्याही कमी होत आहे. पश्‍चिम वर्‍हाडातील कुंभार आता पणत्या स्वत: बनविण्याऐवजी परराज्यातील व्यापार्‍यांकडून तयार पणत्या घेऊन, त्या विकण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत.दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मीच्या मुर्त्या, मापलं, खेळभांडी तयार करण्याचे काम कुंभार करतात. कुंभार समाजाच्या या परंपरागत व्यवसायावर हळूहळू कोलकाताच्या व्यापार्‍यांनी अतिक्रमण केले. आता काही मोजके कुंभार वगळता, बहुतेकांनी पणत्या बनविणे बंद केले आहे. कोलकाता येथील टेराकोटाच्या पणत्या बाजारात येण्यापूर्वी एक कुंभार जवळपास ५0 हजार पणत्या बनवायचा. आता हे कुंभार कोलकाताच्या व्यापार्‍यांकडून ५00 रूपये प्रति हजार या भावाने टेराकोटाच्या पणत्या विकत घेतात. नंतर याच पणत्या ते बाजारपेठेत ९00 रूपये प्रति हजार या भावाने विकतात. कुंभारांनी हाताने घडविलेल्या पणत्यांपेक्षा टेराकोटाच्या पणत्या आकर्षक असतात. त्यामुळे या पणत्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे कुंभार तयार पणत्या विकण्याच्या व्यवसायाकडे मोठय़ा प्रमाणात वळले आहेत.टेराकोटाच्या पणत्या आम्ही बनविलेल्या पणत्यांपेक्षा जास्त आकर्षक असतात. त्यामुळे मातीच्या पणत्या ग्राहक खरेदी करणे सहसा टाळतात. त्यामुळे आम्ही कोलकाताच्या व्यापार्‍यांकडून थोक भावात पणत्या विकत घेऊन, त्यांची किरकोळ विक्री करतो, असे वाशिम येथील कुंभारगल्लीतील एका कुंभाराने सांगितले.