शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कांदा बीजोत्पादन पेरणीलाही विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:45 IST

अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोेला: जिल्ह्यात कांदा उत्पादन वाढत आहे; परंतु अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत आहे. त्याला शेतकरी गटदेखील कांदा लागवडीसाठी पुढे आले आहेत. शेतकरी गटांनी कांदा लागवड करू न भरघोस उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. कांदा बीजोत्पादनपासूनदेखील चांगले उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्याकडेही वळला आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे लागवडीस एक महिना उशीर झाला आहे. अकोला तालुक्यातील शिवापूर, चिखलगाव, कापशी, माझोड आदी गावच्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केली आहे.जिल्ह्यात कांदा उत्पादन वाफा पद्धतीने घेतले जाते. या पिकातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटांनी अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणाºया या पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. इतरही नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा संकल्प शेतकरी गटांनी केला आहे. शेतकरी गटांना कांदा बीजोत्पादनासाठी मदत केली तसेच कृषी विभागाने काढलेल्या कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळीला प्रोत्साहन दिले आहे. या जिल्ह्यात कांदा चाळी निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुुळे कांदा उत्पादक शेतकºयांच्या आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, कांदा पिकाचे क्षेत्र पुन्हा वाढणार असल्याचा विश्वास शेतकºयांना आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी कांदा चाळी तयार केल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी