शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

राजराजेश्वराला भक्तांचा जलाभिषेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक करून, हा आनंदसोहळा द्विगुणित केला.यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली व वातावरणात आनंद भरला. सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. गांधीग्राम येथून पूर्णेच्या पात्रातून जल आणून, त्याचा अभिषेक राजराजेश्वराला केला. यावेळी पावसानेही हजेरी लावत शिवभक्तांवर अभिषेक केल्याचे दृष्य होते. यंदाच्या पालखीमध्ये जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची होती, यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली. कावडसोबतच शिभक्तांनी पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारले होते.विविध शिवभक्त मंडळांनी साकारलेले पालखीवरील आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महादेवाच्या विविध छटा शिवभक्त मंडळांनी साकारल्या होत्या. कावडयात्रा उत्सव हा अकोलेकरांसाठी एक पर्वणीच ठरली. या सोहळ्यानिमित्त व्यापारी, दुकानदार यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करून उत्सवात सहभाग घेतला. नागरिकांनीही हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गांधीग्राम ते अकोला १७ किमीचे अंतर पायी कापल्यानंतरही पालखीतील शिवभक्तांचा उत्साह जराही कमी झाला नाही.शिवभक्तानी राजेश्वराला पाच प्रदक्षिणा घालून शिवभक्तांनी भक्तिभावाने जलाभिषेक केला. चिमुकल्या बालक, युवक, आबालवृद्ध सर्वच कावडयात्रेचे खांदेकरी होऊन उत्साहात सहभागी झाले. पालखी मार्गावरील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांच्यावतीने शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.