शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

राजराजेश्वराला भक्तांचा जलाभिषेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक करून, हा आनंदसोहळा द्विगुणित केला.यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली व वातावरणात आनंद भरला. सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. गांधीग्राम येथून पूर्णेच्या पात्रातून जल आणून, त्याचा अभिषेक राजराजेश्वराला केला. यावेळी पावसानेही हजेरी लावत शिवभक्तांवर अभिषेक केल्याचे दृष्य होते. यंदाच्या पालखीमध्ये जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची होती, यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली. कावडसोबतच शिभक्तांनी पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारले होते.विविध शिवभक्त मंडळांनी साकारलेले पालखीवरील आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महादेवाच्या विविध छटा शिवभक्त मंडळांनी साकारल्या होत्या. कावडयात्रा उत्सव हा अकोलेकरांसाठी एक पर्वणीच ठरली. या सोहळ्यानिमित्त व्यापारी, दुकानदार यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करून उत्सवात सहभाग घेतला. नागरिकांनीही हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गांधीग्राम ते अकोला १७ किमीचे अंतर पायी कापल्यानंतरही पालखीतील शिवभक्तांचा उत्साह जराही कमी झाला नाही.शिवभक्तानी राजेश्वराला पाच प्रदक्षिणा घालून शिवभक्तांनी भक्तिभावाने जलाभिषेक केला. चिमुकल्या बालक, युवक, आबालवृद्ध सर्वच कावडयात्रेचे खांदेकरी होऊन उत्साहात सहभागी झाले. पालखी मार्गावरील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांच्यावतीने शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.