शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निकृष्ट सिमेंट रस्ते; ‘व्हीएनआयटी’मार्फत तपासणीचा मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:16 IST

अद्यापही ‘व्हीएनआयटी’च्या तपासणीला मुहूर्त सापडत नसल्याने मनपाने भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.

अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अत्यंत दर्जाहीन होत असल्याची तक्रार भाजपच्या खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी रस्त्यांचे सोशल आॅडिट केले. यासंदर्भातील अहवाल पुढील कारवाईसाठी मनपा प्रशासनाकडे सोपवल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यांची ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेत सर्वसाधारण सभेचा ठराव मिळवला. ठराव घेऊन चार महिन्यांचा कालावधी होत आला तरी अद्यापही ‘व्हीएनआयटी’च्या तपासणीला मुहूर्त सापडत नसल्याने मनपाने भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली आहे.शहरातील दर्जाहीन सिमेंट रस्त्यांची अवघ्या पाच ते सहा महिन्यांत वाट लागल्यानंतर खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर तसेच भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मनपाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सहापैकी पाच सिमेंट रस्त्यांचे निर्माण करताना मजबुतीकरणाचे सर्व निकष-नियम पायदळी तुडविण्यात आल्याने अवघ्या सहा महिन्यांतच सिमेंट रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिगळ लावण्याची वेळ कंत्राटदारावर आली होती. याप्रकरणी भाजप लोकप्रतिनिधींनी सखोल चौकशीची मागणी लावून धरल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे २२ ते २७ जुलै २०१८ दरम्यान सोशल आॅडिट केले. सोशल आॅडिटच्या अहवालात पाच सिमेंट रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी मनपाकडे अहवाल सादर केला होता. हा अहवाल बाजूला सारत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत सिमेंट रस्त्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय २२ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत घेतला.पत्रव्यवहारासाठी चार महिनेयासंदर्भातील ठराव तयार झाल्यानंतर मनपाने ‘व्हीएनआयटी’कडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. या पत्रानंतर संबंधित यंत्रणेकडून तपासणीसाठी नेमका किती खर्च येईल, याबद्दल माहिती दिली जाणार आहे. अर्थात, ‘व्हीएनआयटी’ने सादर केलेला खर्च मनपाला न परवडल्यास पुढे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. एकूणच या प्रकरणी प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहेत.

दोन महिने ठराव रखडतोच कसा?मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी २२ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत ‘व्हीएनआयटी’मार्फत रस्त्यांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव सभागृहात मंजूर झाला. एरव्ही पदाधिकारी असो वा प्रशासन या दोघांच्या हिताचे ठराव मंजूर होण्यापूर्वीच त्याला कार्योत्तर मंजुरी दिली जाते. ‘व्हीएनआयटी’चा ठराव दोन महिने रखडला होता. यावरून प्रशासन व सत्ताधारी भाजप किती गंभीर आहेत, याचा प्रत्यय येतो.भाजपच्या भूमिकेकडे अकोलेकरांचे लक्षनिकृष्ट रस्त्यांची तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केल्यानंतरच खऱ्या अर्थाने चौकशीला प्रारंभ झाल्याचा दावा महापौर विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याप्रकरणी प्रशासनाचा उदासीन कारभार लक्षात घेता भाजप काय निर्णय घेते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका