शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लोहारा येथील शिकस्त पूल ठरतोय धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताची शक्यता असून, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे प्रवाशांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ ...

रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताची शक्यता असून, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे प्रवाशांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. कवठा बॅरेजमुळे मन नदीपात्रात पाणीसाठा असल्यामुळे मन नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पूल निर्मितीकरिता बॅरेजच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली होती व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर निधी वर्गही करण्यात आला; मात्र शेगाव-अकोट हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारात गेल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल निर्मितीतून आपले हात झटकले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पूल निर्मितीकरिता विलंब केल्यामुळे २०१५ ते २०१६ पासून पूल निर्मितीचा मुहूर्तच सापडला नाही.

फोटो:

चार वर्षांपासून पुलाचे काम रखडले.

या पुलाचे काम सुरू झाले होते. नंतर मात्र पुलाचे बांधकाम रखडले. पावसाचे पाणी पुलाखाली साचल्यामुळे जुन्या पुलाचा एक भाग कोसळला. सुदैवाने यात प्राणहानी टळली. या मार्गावरील जड वाहतूक अद्यापही बंदच असून या मार्गावरून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांना साईड देताना अपघात घडण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

लोहारा पूल शिकस्त झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मनसगाव मार्गे निंबा फाटा वळविल्यामुळे प्रवाशांना आता शेगाव जाण्याकरिता एसटी प्रवासाकरिता २० रू. ऐवजी ५० रू. मोजावे लागतात आहेत. तसेच तेल्हारा व अकोटकडे जाणाऱ्या प्रवाशांना नियमित भाड्यापेक्षा ५० ते ६० रुपये भाडे मोजावे लागत आहेत.

वाहतूक सुरळीत करा!

लोहारा पूल तीन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल असून धोकादायक बनलेल्या या पुलाची तत्काळ दुरुस्ती करून व कठडे लावून वाहतूक सुरळीत करावी आणि नवीन पुलाची निर्मितीही तत्काळ करावी, अशी मागणी सरपंच प्रवीण मोरे, जनार्दन साबळे, सरपंच विठ्ठल माळी, श्रीकृष्ण मोरखडे, सरपंच रवींद्र नेमाडे, उमेश ऊबाळे, रवींद्र पोहरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.