शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

आज होणार ‘भूमिगत’वर निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:36 IST

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये शुक्रवारी पुन्हा भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या भूमिकेकडे लक्षसादरीकरणासाठी आग्रही का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये शुक्रवारी पुन्हा भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत अकोला शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर झाली असून ७९ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. महापालिकेने ६१ कोटी रुपये किमतीच्या कामांची निविदा प्रकाशित केली असता इगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीने ८.९१ टक्के जादा दराने निविदा सादर केली. प्रशासनाने सदर कंपनीची निविदा मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी टिप्पणी स्थायी समितीकडे सादर केली.  स्थायी समितीच्या १३ सप्टेंबर रोजीच्या सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेल्या ‘भूमिगत’च्या प्रकल्प अहवालावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ‘डीपीआर’मध्ये ‘एसटीपी’च्या जागेचा समोवश नसून, नेमक्या कोणत्या भागात नाल्यांचे खोदकाम होईल, त्याचे सर्वेक्षण कधी करण्यात आले, पम्पिंग मशीनची उभारणी कोठे होईल, आदी प्रश्नांवर प्रशासन समाधानकारक खुलासा करू शकले नव्हते. त्यामुळे ही निविदा रद्द करून फेरनिविदा बोलाविण्याची मागणी भाजपाचे सदस्य अजय शर्मा, सुनील क्षीरसागर, सुजाता अहीर, शिवसेनेचे सदस्य राजेश मिश्रा, काँग्रेसचे नगरसेवक अँड. इकबाल सिद्दिकी, पराग कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे फैयाज खान, एमआयएमचे नगरसेवक मोहम्मद मुस्तफा यांनी लावून धरली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी व प्रशासनाची भूमिका लक्षात घेऊन, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी भूमिगतची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर अवघ्या चार दिवसांच्या आत महापालिकेला राज्य शासनाचे धमकीवजा पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये ३0 सप्टेंबरपर्यंत प्रकल्पाची वर्कऑर्डर न दिल्यास योजनेसाठी मंजूर निधी इतर शहरांसाठी वापरण्याचे निर्देश होते. भाजपाने पत्राची तातडीने दखल घेत २२ सप्टेंबर रोजी ‘भूमिगत’च्या विषयावर पुन्हा स्थायी समिती सभेचे आयोजन केले आहे. 

सादरीकरणासाठी आग्रही का नाही?शहरातील सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा शेती व उद्योगासाठी वापर करता येईल, अशी ही योजना असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. ‘पीएम’आवास योजना, वैयक्तिक शौचालय योजना तसेच ‘डिजिटल स्कूल’संदर्भात प्रशासनाने सादरीकरण केले होते. भूमिगत गटार योजनेची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याची माहिती झालीच पाहिजे, यासाठी सत्ताधारीसुद्धा आग्रही असतात. कोट्यवधी रुपयांच्या ‘भूमिगत’ योजनेसंदर्भात प्रशासनाने सादरीकरण का केले नाही आणि त्यासाठी सत्ताधार्‍यांनी आग्रही भूमिका का घेतली नाही, असा सवाल उपस्थित होतो.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्षकरवाढीच्या मुद्यावर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी हस्तक्षेप करीत विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. भूमिगत गटार योजनेच्या निविदेसंदर्भात चाललेला खेळखंडोबा पाहता आ. बाजोरिया कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटनेता राजेश मिश्रा यांनी भूमिगत गटार योजनेच्या निविदेला कडाडून विरोध दर्शविला होता. या विरोधाची धार कितपत कायम राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

‘टीडीआर’वर निर्णय प्रलंबित पण..केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घरे बांधून देण्यासाठी शहरात शासकीय जागेची वानवा आहे. त्यावर उपाय म्हणून खासगी जमिनीला ‘टीडीआर’ दिल्यास केवळ त्याच जमिनीवर आवास योजनेंतर्गत घरे बांधून देणे शक्य होईल, या विचारातून महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सादर करून तीन महिन्यांचा कालावधी होत असून, अद्यापही हा प्रस्ताव नगररचना संचालक, पुणे कार्यालयाकडे पडून आहे. गोरगरिबांच्या घरांसाठी तयार केलेला प्रस्ताव धूळ खात असतानाच भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर मात्र शासन मनपावर डोळे वटारून कारवाई करण्यास भाग पाडत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.