शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

बाजार समित्यांच्या बरखास्तीचा निर्णय दुर्दैवी

By admin | Updated: November 14, 2014 00:44 IST

लोकमत परिचर्चेत कृषिउत्पन्न बाजार समितीचे पुनर्गठण करण्याची संचालक व शेतक-यांची मागणी.

अकोला : कृषिउत्पन्न बाजार समित्या या शेतकर्‍यांचे आधारस्तंभ आहेत. या समित्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांसोबतच इतर घटकांचेदेखील भरण-पोषण होते. अशा परिस्थितीत कृषिउत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. सुरळीत बाजार समित्या बरखास्त करण्यापेक्षा शासनाने या समित्यांच्या निवडणुका घेणे योग्य ठरेल, असे मत कृषिउत्पन्न बाजार समित्यांचे संचालक व शेतकर्‍यांचे प्रतिनिधी यांनी गुरुवारी व्यक्त केले. लोकमतच्यावतीने आयोजित परिचर्चेत गुरुवारी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीचा शासनाचा निर्णय कितपत योग्य आहे? या विषयावर संचालक व शेतकर्‍यांनी आपली मते मांडली. या परिचर्चेत अकोला कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिरीष धोत्रे, विशेष कार्यकारी अधिकारी शं.ना. बेंडे, काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर, हमाल-माथाडी कामगार संघटेनेचे शेख हसन कादरी, ग्रेन र्मचंट असोसिएशनचे उपाध्यक्ष ओमप्रकाश गोयनका, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक श्रीकांत खाडे आदी सहभागी झाले होते. प्रशासकीय अधिकार्‍यांनी बाजार समित्यांमध्ये सुरळीतपणा यावा आणि शेतकर्‍यांचे हित जोपासले जावे, यासाठी बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, नव्याने निवडणुका घेण्याचे सूचविले असल्याचे सांगितले. बाजार समित्यांच्या प्रतिनिधींनी कृषिउत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्यानंतर आता शासनाने तात्काळ निवडणुका घेतल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. येणारा काळ हा शेती हंगामाचा आहे. त्यांचा माल बाजारात येणार आहे. अशावेळी कृषिउत्पन्न बाजार समितीचे पुनर्गठण होणे गरजेचे आहे. प्रशासक नेमणे हा पर्याय असू शकत नाही. शासनाने कुठल्या कारणासाठी बाजार समित्या बरखास्त केल्या ते स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणीदेखील या प्रतिनिधींनी केली. शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या बरखास्तीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. आता तात्काळ निवडणुका घेऊन चांगले लोकप्रतिनिधी बाजार समितीकरिता निवडून दिले पाहिजे. बाजार समितीला पर्याय निर्माण केला पाहिजे. शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय शासनाने घेऊन बाजार समित्यांचे पुनर्गठण करावे, असे मत शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केले.