शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील!

By admin | Updated: September 5, 2015 01:48 IST

विधान परिषद निवडणुकीवर सावंत यांचे भाष्य.

अकोला : नोव्हेंबर महिन्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. अकोला-वाशिम आणि बुलडाणा मतदारसंघ तूर्तास शिवसेनेच्या ताब्यात असून, भाजपनेदेखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याबद्दल शिवसेनेचे संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत यांना विचारणा केली असता, आम्ही युतीसाठी अनुकूल आहोत. परंतु या निवडणुकीत युती ठेवायची किंवा नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर न होता शिवसेना-भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील, असे स्पष्ट मत खा.सावंत यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संपर्कप्रमुख खा.अरविंद सावंत शहरात दोन दिवस मुक्कामी होते. जिल्हा व शहर कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भासह मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठीच आम्ही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची भेट घेतल्याचे खा. सावंत यांनी सांगितले. शेतकर्‍यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शिवसैनिकांना गावे दत्तक घेण्याचे निर्देश दिले आहेत. दोन दिवसांच्या दौर्‍यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती बिकट असल्याचे लक्षात आले असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना अवगत केले. खारपाणपट्टय़ातील घुसर येथील शेततळ्य़ांची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतच भाजपनेदेखील तयारी सुरू केली आहे. भाजप कार्यकर्त्यांंच्या बैठका होत असल्याच्या मुद्यावर खा.सावंत यांना छेडले असता, आम्ही युतीसाठी नेहमीच सकारात्मक असतो असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत घडलेला प्रकार मनाला वेदना देणारा होता. विधान परिषदेत युती होणार किंवा नाही, याचा निर्णय सेना, भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील, असे सावंत यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, राजेश मिश्रा, तरूण बगेरे उपस्थित होते.