शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

मध्यावधी निवडणुकांसाठी कर्जमाफीचे नाटक !

By admin | Updated: June 30, 2017 01:55 IST

अ‍ॅड. आंबेडकरांची भाजपा व संघावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करुणा, दया अशा भावना नाहीत.कोणतीही गोष्ट घडली, की फाशी द्या, ही त्यांची सरळ मागणी असते. अशा संघटनांकडून शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाच नाही. कर्जमाफीचे धोरण जाहीर झाल्यापासून आदेश निघेपर्यंत अटी व शर्तींमध्ये हे धोरण अडकले आहे. मुळात या सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही; मात्र मध्यावधी निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून कर्जमाफी देण्याचे नाटक सुरू केल्याची टीका भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.यासंदर्भात अ‍ॅड. आंबेडकर यांनी गुरुवारी काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सरकारने कर्जमाफीच्या अटीमध्ये शेतकऱ्यांना गुंतवले आहे. ज्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांनी आधी दीड लाखांवरचे कर्ज भरले तरच त्याचे कर्ज माफ होणार आहे. दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी आपली आर्थिक पत बँकेत वाढावी म्हणून ३० मार्चच्या आत नवीन कर्ज काढले आणि त्या माध्यमातून जुने कर्ज फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ नाही. तसेच चालू वर्षाचे कर्ज माफ केलेले नाही. ही सारी खेळी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ मिळावा, यासाठीच आहे. भाजपा व संघ हे शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते होणार नाहीत, त्यामुळे शेतीच्या प्रश्नावर लढणारे या संघटनांसोबत राहिले तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.