शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी निवडणुकांसाठी कर्जमाफीचे नाटक !

By admin | Updated: June 30, 2017 01:55 IST

अ‍ॅड. आंबेडकरांची भाजपा व संघावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करुणा, दया अशा भावना नाहीत.कोणतीही गोष्ट घडली, की फाशी द्या, ही त्यांची सरळ मागणी असते. अशा संघटनांकडून शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाच नाही. कर्जमाफीचे धोरण जाहीर झाल्यापासून आदेश निघेपर्यंत अटी व शर्तींमध्ये हे धोरण अडकले आहे. मुळात या सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही; मात्र मध्यावधी निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून कर्जमाफी देण्याचे नाटक सुरू केल्याची टीका भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.यासंदर्भात अ‍ॅड. आंबेडकर यांनी गुरुवारी काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सरकारने कर्जमाफीच्या अटीमध्ये शेतकऱ्यांना गुंतवले आहे. ज्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांनी आधी दीड लाखांवरचे कर्ज भरले तरच त्याचे कर्ज माफ होणार आहे. दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी आपली आर्थिक पत बँकेत वाढावी म्हणून ३० मार्चच्या आत नवीन कर्ज काढले आणि त्या माध्यमातून जुने कर्ज फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ नाही. तसेच चालू वर्षाचे कर्ज माफ केलेले नाही. ही सारी खेळी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ मिळावा, यासाठीच आहे. भाजपा व संघ हे शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते होणार नाहीत, त्यामुळे शेतीच्या प्रश्नावर लढणारे या संघटनांसोबत राहिले तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.