शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात तीन वाघ, तीन बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 18:03 IST

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

- विजय शिंदेअकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु या मृत्यूच्या घटना वन्यजीवप्रेमींमध्ये चिंताजनक ठरत आहेत. एकट्या अकोट उपविभागात सहा महिन्यांत सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, अकोट वन्यजीव विभागात वाघ सर्वाधिक संख्या वाढल्याचे बुद्ध पौर्णिमेला करण्यात आलेल्या जनगणनेत स्पष्ट झाले आहे. पाण्यात बुडून होणारे मृत्यू हा चौकशीचा विषय ऐरणीवर येत आहे.२०१९ या कालावधीत घडलेल्या घटनामध्ये बहुतांश घटना अकोट विभागाशी संबंधित आहेत. अकोला, बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर वारखेड नदीपात्रात गत मार्च महिन्यात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर वान धरणाच्या कालव्यामधील पाण्यात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील सौंदळा शेतशिवारात घडली होती. पश्चिम मेळघाट वन विभागातील हाय पॉइंट या ठिकाणी गत जानेवारी महिन्यात एक दीड वर्षाचा बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. हा मृत्यू बिबट्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने झाले असल्याचे सांगण्यात आले. अकोट तालुक्यातील राहणापूर या शिवारात एक वाघ कुजलेल्या मृतावस्थेत आढळून आला होता. जितापूर भागात एका वाघाच्या मृत्यूमागे रानडुकरासोबत झालेली झुंज हे कारण सांगण्यात आले होते. गत आठवड्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अतिसंरक्षित वनात कोहा गावाजवळील तलावात टी-३२ या वाघाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये धारगड जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला होता. या वाघाच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक सांगण्यात आले होते.राज्यात दोनच पशुवैद्यकीय अधिकारीमहाराष्ट्रात वनखात्याचे दोनच पशुवैद्यकीय अधिकारी हे वाघाचे शवविच्छेदन व अहवाल देणारे आहेत. त्यामुळे खासगी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून काम भागविले जात आहेत. या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी अनेकदा पाण्यात पडल्याने नैसर्गिक मृत्यूची प्राथमिक कारणे दिली आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल अद्यापही अधिकृतपणे जाहीर झाले नसल्याने अनेक मृत्यूंचे ठोस कारण कळू शकले नाही. हे अहवाल येण्यास दीड ते दोन वर्षे लागत असल्याने वन विभागाचे अधिकारी यांना नेमके ठोस उपाययोजना शोधण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे समजते. मेळघाट हा वन्य प्राण्यांचे सुरक्षित अधिवास क्षेत्र समजल्या जाते. मेळघाट क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी हे सतत वन्य प्राण्यांची सुरक्षितता व संवर्धनासाठी सक्षमपणे काम करीत असल्याने झपाट्याने मेळघाटात वन्य प्राणी वाढत आहेत.पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची गावाकडे धावसध्या सातपड्याच्या पायथ्याशी असलेल्या गाववस्ती, शेतशिवारात वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे. पिंप्री जैनपूर, अकोली जहा.सह परिसरातील केळीच्या बागा वाघाचे अधिवास क्षेत्र होत आहे. दुसरीकडे वाघ, बिबटसह वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे बहुतांश कारण हे पाण्यात बुडून दिसल्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे मृत्यू रोखण्यासाठी वन अधिकाऱ्यांसह वन्यजीवप्रेमींचा लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पMelghatमेळघाटAkolaअकोलाakotअकोटTigerवाघ