शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

देशात ‘रेबीज’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले!

By रवी दामोदर | Updated: September 29, 2023 16:30 IST

आशिया आणि अफ्रिका देशांमध्ये रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.

अकोला : कुत्र्यांपासून माणसांना जीवघेणा रेबीज आजार होतो. जगभरात दरवर्षी ५९ हजारपेक्षा जास्त लोकांचा रेबीज या आजारामुळे मृत्यू झाला आहे. देशातही गत दोन वर्षांमध्ये रेबीजमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल ३६ टक्के मृत्यू देशात झाले आहे. २२ हजारांहून अधिक नागरिकांचा रेबीज या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

आशिया आणि अफ्रिका देशांमध्ये रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी श्वानांमधील अॅन्टी रेबीज लसीकरण प्रभावीरीत्या मोहिम स्वरुपात राबविणे गरजेचे आहे. भारतात ९५ टक्के प्रकरणात कुत्र्यांमुळे, दोन टक्के प्रकरणात मांजर आणि एक टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगूसामुळे रेबीज आजार पसरतो. रेबीजमुळे जगातून सार्वाधिक मृत्यू हे देशात होतात. त्यामुळे कुत्रा पाळणा-या कुटुंबांनी श्वानांमधील अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. रेबीज पशुसंक्रमित मानवी आजार असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. 

रेबीज आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी श्वानांमधील एन्टी रेबीज लसीकरण प्रभावीरीत्या मोहिम स्वरुपात राबविणे गरजेचे आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कुत्र्यांचे श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.- डॉ .जगदीश बुकतारे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, अकोला.