शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू; जि.प. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार विमा कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 16:32 IST

कुटुंबीयांना संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून विमा कवच रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे.

अकोला: कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोरोना विषाणू संसर्गामुळे ३० सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्या राज्यातील ११ जिल्हा परिषदांच्या १७ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० नोव्हेंबर रोजी घेतला. त्यानुसार कर्तव्य बजावताना कोरोना संसर्गामुळे मयत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून विमा कवच रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्गामुळे गत ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील ११ जिल्हा परिषदांच्या १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना (वारसास) प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम मिळण्यासंदर्भात संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुषंगाने कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या ११ जिल्हा परिषदांच्या १७ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे विमा कवच रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत २० नाेव्हेंबर रोजी घेण्यात आला. विमा कवच रक्कम देण्यासाठी राज्य शासनामार्फत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान राज्य प्रकल्प संचालकांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत विमा कवच रक्कम संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदनिहाय कर्मचारी मृत्यूची अशी आहे संख्या!

कोरोना काळात ३० सप्टेंबरपर्यंत कर्तव्य बजावताना कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील ११ जिल्हा परिषद अंतर्गत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भंडारा १, अहमदनगर २, पुणे ४, ठाणे १, रायगड १, सांगली १, जळगाव १, कोल्हापूर १, नागपूर २, अमरावती २ व सातारा जिल्हा परिषद अंतर्गत १ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या