शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

विद्युत भवनसमोर अंधार; नागरिकांची महावितरणच्या कार्यालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:17 IST

न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण कंपनीचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोरील न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले, तसेच संबंधित अभियंत्यास समज देऊन ही समस्या िनकाली काढावी, अशी मागणी केली आहे.सध्या पावसाळ्याच्या दिवसात थोडी जरी हवा सुटल्यास, पाऊस आल्यास अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेक भागात वायरवर झाडांच्या फांद्या पडत असल्याने वायर तुटण्याच्या घटनाही नित्याच्याच झाल्या आहेत. जुने शहरात तर अनेक ठिकाणी वायर कमी उंचीवर असल्याने जड वाहनांमुळे वायर तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, विद्युत खंडित होण्याचा प्रकार आता तर महावितरणचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन परिसरातही घडत आहे. न्यू भागवत प्लॉट परिसरातील नागरिक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांकडे धाव घेऊन समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी राजेश पाटील, विनोद लाहोटी, अर्चना पांडे, अशोक झंवर, तुषार सोमाणी, दिनेश गाढे, दीप्ती जोशी, मंजिरी काळे, उमेश पोपट, शशांक परमार, चिमनभाई दोडिया, पुरुषोत्तम अग्रवाल, सतीश सहस्त्रबुद्धे, नवलचंद कोचेरा, तुषार मालविय, प्रकाश काळे, चंद्रकांत देशमुख, सुरतसिंह ठाकूर, वसंत सोनोने, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रकाश मारडिया हे निवेदन देण्यासाठी गेले होते. रात्री रस्त्यावर अंधाराचे साम्राज्यन्यू. भागवत प्लॉट परिसरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. अनेकदा रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित असल्याने पथदिवेही बंद होतात. अशा वेळी एखाद्या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना त्यांच्या नातेवाइकांची कसरत होते. रात्री विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने चोरट्यांचे फावले असून, नागरिकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहेत. हलगर्जी करणाऱ्या अभियंत्यांवर वरिष्ठ का कारवाई करीत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.टोल फ्री नंबर त्रासदायकविद्युत पुरवठा खंडित झाल्यास या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधल्यास ग्राहकाला ग्राहक क्रमांक नोंदवण्यास सांगण्यात येते. त्यानंतर १५ ते २० मिनिट प्रतिसाद देत नाही. नंतर कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे ट्रान्सफर केला जातो. अनेकदा ग्राहक सेवा प्रतिनिधी तक्रार नोंदवली असे सांगतात, मात्र तक्रार क्रमांकच देत नाहीत. तक्रारकत्यार्ने मागणी केल्यानंतरही त्याला तक्रार क्रमांक न देता ह्यतुमची तक्रार संबंधितांकडे फॉरवर्ड केली आहेह्ण, असे सांगून फोन बंद करतात, असा प्रकार अनेक तक्रारकर्त्यांसोबत घडला आहे.