शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत भवनसमोर अंधार; नागरिकांची महावितरणच्या कार्यालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:17 IST

न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरण कंपनीचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोरील न्यू भागवत प्लॉट परिसरात रोज ८ ते १० तास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले, तसेच संबंधित अभियंत्यास समज देऊन ही समस्या िनकाली काढावी, अशी मागणी केली आहे.सध्या पावसाळ्याच्या दिवसात थोडी जरी हवा सुटल्यास, पाऊस आल्यास अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेक भागात वायरवर झाडांच्या फांद्या पडत असल्याने वायर तुटण्याच्या घटनाही नित्याच्याच झाल्या आहेत. जुने शहरात तर अनेक ठिकाणी वायर कमी उंचीवर असल्याने जड वाहनांमुळे वायर तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, विद्युत खंडित होण्याचा प्रकार आता तर महावितरणचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन परिसरातही घडत आहे. न्यू भागवत प्लॉट परिसरातील नागरिक विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी मुख्य अभियंत्यांकडे धाव घेऊन समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी राजेश पाटील, विनोद लाहोटी, अर्चना पांडे, अशोक झंवर, तुषार सोमाणी, दिनेश गाढे, दीप्ती जोशी, मंजिरी काळे, उमेश पोपट, शशांक परमार, चिमनभाई दोडिया, पुरुषोत्तम अग्रवाल, सतीश सहस्त्रबुद्धे, नवलचंद कोचेरा, तुषार मालविय, प्रकाश काळे, चंद्रकांत देशमुख, सुरतसिंह ठाकूर, वसंत सोनोने, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रकाश मारडिया हे निवेदन देण्यासाठी गेले होते. रात्री रस्त्यावर अंधाराचे साम्राज्यन्यू. भागवत प्लॉट परिसरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. अनेकदा रात्री अचानक विद्युत पुरवठा खंडित असल्याने पथदिवेही बंद होतात. अशा वेळी एखाद्या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना त्यांच्या नातेवाइकांची कसरत होते. रात्री विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने चोरट्यांचे फावले असून, नागरिकांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचे प्रकार घडत आहेत. हलगर्जी करणाऱ्या अभियंत्यांवर वरिष्ठ का कारवाई करीत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.टोल फ्री नंबर त्रासदायकविद्युत पुरवठा खंडित झाल्यास या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधल्यास ग्राहकाला ग्राहक क्रमांक नोंदवण्यास सांगण्यात येते. त्यानंतर १५ ते २० मिनिट प्रतिसाद देत नाही. नंतर कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे ट्रान्सफर केला जातो. अनेकदा ग्राहक सेवा प्रतिनिधी तक्रार नोंदवली असे सांगतात, मात्र तक्रार क्रमांकच देत नाहीत. तक्रारकत्यार्ने मागणी केल्यानंतरही त्याला तक्रार क्रमांक न देता ह्यतुमची तक्रार संबंधितांकडे फॉरवर्ड केली आहेह्ण, असे सांगून फोन बंद करतात, असा प्रकार अनेक तक्रारकर्त्यांसोबत घडला आहे.