शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

गारपीटीमुळे तुर, हरभरा, फळबागांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 19:02 IST

Agriculture News : २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यात २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

किनखेड, कामठा, मुरंबा, शिवण खुर्द, कमळणी, कमळखेड, निंबा, मोहखेड, खांदला, धोत्रा, कानडी, शेंद, उमरी अरब या भागाला गारपीटीचा जबर तडाखा बसला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यासह शहरात मंगळवारी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, तुर, कांदा व फळबाग पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात काही जिल्ह्यांत गारपिटीसह प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान २८ डिसेंबर रोजी दुपारी वीजांच्या कडकडाट गारपीटीसह पावसाने जोरदार झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे  शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तालुकयातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची कापणी सुरूवात होण्यापूर्वीच पावसाने व गारपीटीने तुरीला वाळलेल्या शेंगा फुटून शेतात सर्वत्र दाणे विखुरल्याने दाण्यांचा सडा असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर हरभरा, गहू, कांदा पिके जमिनदोस्त झाली आहे तर फळबागांचे फळे व आलेला बार पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.  तालुक्यातील मौजे किनखेड, शिवण, कामठा, मुरंबा, अनभोरा, कमळणी कमळखेड, निंबा, धोत्रा, धानोरा पाटेकर, शेंद, बिडगाव, शिवण खुर्द, मोहखेड, अनभोरा, कानडी, उमरी अरब या परीसरातील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. तर निंबा येथे गुरांच्या गोठ्यावर झाड उन्मळून पडल्याने गोठ्यात बांधलेली गुरे गंभीर जख्मी झाली आहेत खांदला येथे आवळा व लिंबाचा आकाराची गार पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती