शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अवकाळीमुळे पातूर तालुक्यातील ४६ घरांचे नुकसान; कांदा, पपई, लिंबूसह भाजीपालावर्गीय पिकांना फटका

By रवी दामोदर | Updated: April 1, 2023 19:49 IST

गत दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत ३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता.

अकोला :

गत दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत ३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. आता पुन्हा दि.३१ मार्च रोजी जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पातूर तालुक्यातील तब्बल ४६ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील १३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, पपई, लिंबूसह भाजीपालावर्गीय पिकांना अधिक फटका बसला आहे.

हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. सोसाट्याच्या वाऱ्याने पातूर, बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागांसह शहरामध्ये विद्युत खांबांसह मोठे वृक्ष पूर्णतः कोसळले होेते. तर कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अकोला शहरासह इतर तालुक्यात अवकाळीच्या सरी कोसळल्या. शुक्रवार, दि.३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास काही भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडला. याचा काढणीवर आलेल्या गहू पिकाला फटका बसला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला असतानाच शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीवर आलेल्या गहू पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. 

नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणीजिल्ह्यात शुक्रवारी अवकाळी पाऊस व वादळामुळे पातूर तालुक्यातील ४६ घरांचे, तर बार्शीटाकळी तालुक्यातील कांदा, टरबूज, गहू, पपई, भाजीपाला इत्यादी शेतीपिकाचे अंदाजे १३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी पीक विम्याचा भरणा केला होता, त्यांना पीक विम्याची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.